भारतीय सैन्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला; खोटे दावे करताच केली पोलखोल

Operation Sindoor | पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप लोकांचा बळी घेतल्यानंतर भारताने ७ मे रोजी पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. त्यानंतर पाकिस्तानने देखील भारतावर ड्रोन, मिसाईलद्वारे हल्ले केले आहेत.
मात्र भारतीय लष्काराने देखील पाकिस्तानचे हे सर्व हल्ले उलथवून टाकले आहेत. यातच पाकिस्तानकडूनअनेक फेक न्यूज पसरवल्या जात आहेत. भारतीय तळांवरच्या हल्ल्यांसंबंधी पाककडून दिशाभूल सुरु आहे. मात्र पाकचे दावे भारताने फेटाळून लावले आहेत. नुकतेच परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी पाकिस्तानकडून सुरू असलेल्या हल्ल्याची आणि खोट्या दाव्याची माहिती दिली.
#WATCH | Delhi: Colonel Sofiya Qureshi says, “After Pakistan deliberately targeted air bases, Indian armed forces took a quick and well-planned retaliatory action and targeted technical installations, command & control centres, radar sites and arms store. Pakistan military bases… pic.twitter.com/BoWL3AzOe5
— ANI (@ANI) May 10, 2025
पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले की, “पाकिस्तानी सैन्याने पश्चिमी सीमेवर हल्ले केले आहेत. नियंत्रण रेषेवर 26 ठिकाणी पाकिस्तानने हवाई घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. भारतीय सैन्य तळांना टार्गेट करण्याचा पाकने प्रयत्न केला. एलओसीवर सातत्याने गोळीबार केला जात आहे. श्रीनगरपासून अनेक ठिकाणांवरून हवाई घुसखोरीचा प्रयत्न केला त्याला भारतीय सैन्याने उत्तर दिले.”
‘पाकिस्तान नागरी विमानांचा गैरवापर करत आहे’
“उधमपूर, भटिंडासारख्या ठिकाणी उपकरणांना नुकसान पोहचवले. पंजाबच्या एअरपेसवर मिसाईड डागण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी वैद्यकीय सेवांना टार्गेट केले. भारतीय सैन्यानेही पाकचे हल्ले परतावून लावले. पाकिस्तान नागरी विमानांचा गैरवापर करत असल्याने भारतीय सैन्याने संयमाने प्रत्युत्तर दिले आहे,” असेही त्यांनी सांगितले. Operation Sindoor |
याशिवाय सियालकोटचा हवाई तळ भारतानं उद्ध्वस्त केलं आहे. लाहोरमधून नागरी विमानांच्या आडून पाकनं हल्ले केले आहेत. पाकिस्तानने भारतातील नागरी वस्ती आणि लष्करी तळांना लक्ष्य करुन हल्ले केले. ड्रोन आणि क्षेपणास्त्राच्या साह्याने शाळा आणि वैद्यकीय सेंटरला लक्ष्य केलं, असे कर्नल कुरैशी यांनी म्हटले. Operation Sindoor |
पाकिस्तानकडून लाहोरवरुन नागरी हवाई उड्डाणासाठी वापरण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय मार्गाचा दुरुपयोग केला जात आहे. पाकिस्तानी विमानांच्या हालचाली गुप्त ठेवण्यासाठी हे सुरु आहे. तसेच पाकिस्तानकडून भारताविरोधात अपप्रचार केला जात असल्याचेही कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले.
‘चुकीच्या बातम्या पाकिस्तानकडून पसरवल्या जात आहेत’
तसेच भारताची एस-400 ही यंत्रणा निष्क्रीय केल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. मात्र हा दावा अतिशय निराधार आणि खोटा असल्याचं आज भारत सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सूरतगड, चंदीगडसारख्या अनेक शहरांत शस्त्रसाठा नष्ट केल्याच्या चुकीच्या बातम्या पाकिस्तानकडून पसरवल्या जात आहेत. भारतीय एअरफोर्सला नुकसान पोहचवल्याचा पाकचा दावा खोटा आहे. सिरसा, सूरत एअरबेसचे व्हिडिओ, फोटो पत्रकार परिषदेत दाखवत येथे कोणतेही नुकसान झालेले नाही असं सांगण्यात आले. अशा पद्धतीने पाकने केलेल्या खोट्या दाव्यांचा पत्रकार परिषदेत सोफिया कुरेशी यांनी बुरखा फाडला आहे. Operation Sindoor |
हेही वाचा:
‘ऑपरेशन सिंदूर’ला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानचे ‘बुन्यान-उल-मर्सूस’ नापाक मिशन; याचा नेमका अर्थ काय?





