India vs South Africa – टीम इंडियाचा टी-२० विश्वचषकातील तिसरा सामना ३० ऑक्टोबर रोजी साऊथ आफ्रिका संघाविरुद्ध खेळला जाणार आहे. भारतीय संघ सध्या दोन विजयांसह सुपर-१२ च्या गट-२ मध्ये ४ अंकांसह अव्वल स्थानी विराजमान आहे. त्यामुळे आता आफ्रिकेविरुद्धचा सामना जिंकल्यास टीम इंडिया सेमीफायनलसाठी पात्रतेच्या खूपच जवळ जाईल. तर दुसरीकडे पाकिस्तान संघावर स्पर्धेबाहेर पडण्याची नामुष्की ओढवली आहे. कारण त्यांनी स्पर्धेतील दोन्ही सामने घामावले आहेत. आता पाकिस्तान संघाच्या नजरा भारत-साऊथ आफ्रिका सामन्यावर असणार आहेत.
केएल राहुलला बाहेर काढा अन् ऋषभ पंतला खेळावा, चाहत्यांची मागणी!
पाकिस्तान संघाने स्पर्धेतील पहिले दोन सामने गमावले आहेत. पहिल्या सामन्यात भारत आणि दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानला लोळवले आहे. पाकिस्तान संघाला दोन्हीही सामन्यात शेवटच्या चेंडूवर पराभव पत्करावा लागला आहे. मात्र इतर संघाच्या विजय-पराभवाची समीकरणे जुळवल्यास पाकिस्तान संघाला अजूनही सेमीफायनलमध्ये जाणे शक्य आहे. मात्र त्यांना भारताने पुढील राहिलेल्या तीनही सामन्यांत मोठ्या फरकाने विजय मिळवावा, अशी प्रार्थना करावी लागणार आहे. ( India vs South Africa )
भारतीय संघाने राहिलेल्या सामन्यांमध्ये आफ्रिकेसह झिम्बाब्वे आणि बांगलादेशला पराभूत करावे लागेल. अशी प्रार्थना आता पाकिस्तान संघाला करावी लागणार आहे. त्याचबरोबर झिम्बाब्वेने उरलेल्या तीन सामन्यांपैकी दोन सामने गमावले तर पाकिस्तानसाठी फायद्याचे ठरणार आहे. झिम्बाब्वेचे पुढील तीन सामने बांगलादेश, नेदरलँड आणि भारताविरुद्ध आहेत. त्यापैकी बांगलादेश आणि नेदरलँड्सविरुद्ध झिम्बाब्वेच्या विजयाची शक्यता अधिक आहे. ( India vs South Africa )
याव्यतिरिक्त पाकिस्तान संघाला उर्वरित तीन सामन्यांमध्ये मोठ्या फरकाने विजय नोंदवावे लागणार आहेत. या तीन सामन्यांमध्ये पाकिस्तानला नेदरलँड, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असणार आहे. झिम्बाब्वे विरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान संघाचा आत्मविश्वास पूर्णपणे डगमगला आहे. त्यामुळे ते आता त्यांच्या पुढील सामन्यांमध्ये कशी कामगिरी करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.