नवी दिल्ली :– भारत ड्रोन तंत्रज्ञानाचे केंद्र बनेल आणि पुढील वर्षापर्यंत भारताला किमान एक लाख ड्रोन पायलट्सची आवश्यकता भासेल, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी म्हटले आहे. ते आज चेन्नई येथे “ड्रोन यात्रा 2.0′ च्या शुभारंभानंतर उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते.
बीटिंग रिट्रीट दरम्यान, आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील भारतीय स्टार्ट-अप “बॉटलॅब डायनॅमिक्स’ द्वारे 1000 “मेड इन इंडिया’ ड्रोनच्या नेत्रदीपक प्रदर्शनाने संपूर्ण देश मंत्रमुग्ध झाला. स्वामित्व योजनेचा भाग म्हणून ड्रोन द्वारे गावांमधील जमीन आणि घरांचे सर्वेक्षण केले जात आहे, असेही ते म्हणाले. ग्रामीण भागातील शेतांमध्ये कीटकनाशके आणि नॅनो खतांची फवारणी करण्यासाठी ड्रोनचा वापर वाढत आहे.
India is emerging as a leading player in the drone tech space!
Launched the 1st Drone Skilling & Training Conference and flagged off the Drone Yatra at Garuda Aerospace, Agni College of Technology, Chennai. Also tried my hand at flying one! pic.twitter.com/rIhe95Bh7A
— Anurag Thakur (@ianuragthakur) December 6, 2022
संरक्षणापासून शेतीपर्यंत आणि आरोग्यापासून मनोरंजनापर्यंतच्या विविध क्षेत्रांसाठी ड्रोन तंत्रज्ञान आवश्यक आहे. प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह सारख्या योजनांद्वारे भारत एक मजबूत ड्रोन उत्पादन परिसंस्था तयार करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
Parliament Winter Session : सरकारी बॅंकांचे एकत्रीकरण लाभदायी – केंद्रीयमंत्री सोम प्रकाश
सध्या देशात 200 हून अधिक ड्रोन स्टार्ट-अप कार्यरत आहेत, ही संख्या वाढून लाखो तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले. प्रभावी धोरणे, उद्योगांना प्रोत्साहन आणि “व्यवसाय सुलभता’ यामुळे ड्रोन क्षेत्राला आवश्यक असलेली प्रेरणा मिळत आहे. भारतातील या क्षेत्राची प्रचंड क्षमता त्यामुळे दिसते, असे ठाकूर म्हणाले.