INDIA ALLIANCE: केंद्र सरकारच्या ‘त्या’ निर्णयाविरोधात इंडिया आघाडीचे २३ पक्ष एकवटले ; सरन्यायाधिशांना पाठवले पत्र
INDIA ALLIANCE: इंडिया आघाडी एसआयआर (SIR) वरून निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला सातत्याने निशाणा साधत आहे.

INDIA ALLIANCE: इंडिया आघाडी एसआयआर (SIR) वरून निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला सातत्याने निशाणा साधत आहे. आता, इंडिया आघाडीने या निर्णयाविरोधात एक मोठे पाऊल उचलले आहे.
विरोधी पक्षांनी एसआयआर, मतदानात हेराफेरीचे आरोप आणि कथित निवडणूक घोटाळ्यासंदर्भात सरन्यायाधीश सूर्यकांत यांना पत्र लिहिले आहे. काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली.
इंडिया आघाडीकडून सरन्यायाधीशांना पत्र (INDIA ALLIANCE )
काँग्रेस खासदाराने सोशल मीडियावर पोस्ट करत, “८ जून २०२६ रोजी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीला २१ राजकीय पक्ष आणि एक अपक्ष उमेदवार उपस्थित होते. या बैठकीत सरन्यायाधीशांना संयुक्त पत्र पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. निवडणूक आयोगाच्या एसआयआर प्रक्रियेकडे आणि निवडणुकीशी संबंधित इतर मुद्द्यांकडे लक्ष वेधणे हा हे पत्र पाठवण्याचा उद्देश होता.”असे म्हटले आहे. (INDIA ALLIANCE)
त्यांनी पुढे लिहिले, “या निर्णयानुसार, आज सरन्यायाधीशांना एक संयुक्त पत्र पाठवण्यात आले आहे, ज्यावर आता २३ राजकीय पक्ष आणि एका अपक्ष उमेदवाराच्या स्वाक्षऱ्या आहेत.” सर्व विरोधी पक्ष एकजूट, ऐक्य आणि प्रतिकाराच्या भावनेने खंबीरपणे एकत्र उभे आहेत.
21 political parties plus one Independent attended the INDIA janbandhan meeting on June 8, 2026 where a decision was taken to address a joint letter to the Hon’ble Chief Justice of India on the SIR process of the Election Commission of India and other election-related issues.…
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) June 30, 2026
८ जून रोजी इंडिया आघाडीच्या बैठकीत घेतलेला निर्णय (INDIA ALLIANCE)
८ जून, २०२६ रोजी, नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये इंडिया कोएलिशनची बैठक झाली. या बैठकीत एकवीस राजकीय पक्ष आणि एका अपक्ष सदस्याने भाग घेतला.
निवडणूक आयोगाच्या एसआयआर प्रक्रियेबाबत आणि इतर निवडणूक-संबंधित मुद्द्यांबाबत भारताच्या सरन्यायाधीशांना संयुक्त पत्र लिहिण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, हे संयुक्त पत्र मंगळवारी सरन्यायाधीशांना पाठवण्यात आले.
पाच मुद्द्यांवर एकमत (INDIA ALLIANCE)
या बैठकीत इंडिया कोएलिशनमधील राजकीय पक्षांनी विविध मुद्द्यांवर आपली मते व्यक्त केली. पाच मुद्द्यांवर एकमत झाले, ज्यावर लक्ष केंद्रित करून पाठपुरावा करण्याचे ठरले.
यामध्ये मतदार याद्यांची विशेष सखोल पुनर्तपासणी (एसआयआर), तपास यंत्रणांच्या गैरवापराचे आरोप, पेपरफुटीवरून शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा आणि महागाई, बेरोजगारी व परराष्ट्र धोरणावर सरकारला कोंडीत पकडणे यांचा समावेश होता. बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.





