मुंबई – बीसीसीआयने आगामी श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 व एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी मंगळवारी रात्री उशिरा भारतीय संघाची निवड जाहीर केली. अर्थात ही निवड कोणी केली हा प्रश्न असून त्यावर बीसीसीआय लपवाछपवी करत आहे. संघ निवड ही बीसीसीआयने बरखास्त केलेल्या निवड समितीनेच ही निवड केल्याचे समोर आले आहे. मात्र, संघाची घोषणा केल्यावरही बीसीसीआयने ही निवड कोणी केली याचा थेट उल्लेख करणे टाळले असून केवळ आमच्या समितीने ही निवड केल्याचे सांगितले आहे.
#TeamIndia | ‘या’ खेळाडूचं करिअर संपुष्टात? कसोटी, टी-20 आणि आता वनडेमधूनही हकालपट्टी
बांगलादेश विरुद्धची मालिका खेळून मायदेशी परतलेल्या भारतीय संघातून श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी अनेक बदल करण्यात आले आहेत. देशांतर्गत स्पर्धेतील कामगिरी पाहूनही काही खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तसेच प्रमुख खेळाडू व नियमित कर्णधार रोहित शर्मा याच्यासह विराट कोहली, लोकेश राहुल व ऋषभ पंत यांना टी-20 संघातून ब्रेक देण्यात आला आहे. रोहित व पंतला दुखापत झाल्याची मखलाशीही बीसीसीआयने केली आहे.
#TeamIndia | ‘या’ खेळाडूचं करिअर संपुष्टात? कसोटी, टी-20 आणि आता वनडेमधूनही हकालपट्टी
तसेच रोहितकडे एकदिवसीय संघाचे नेतृत्व कायम ठेवले गेले आहे. पंतला दुखापत झाली असून त्याला तंदुरुस्त होण्यासाठी लवकरच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) पाठवले जाणार असल्याचेही नमूद करण्यात आले असले तरीही जाहीर केलेल्या घोषणेत तसा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. पंतच्या जागी इशान किशन व संजू सॅमसन यांना यष्टीरक्षक म्हणून टी-20 संघात निवडले गेले आहे. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत मात्र, कर्णधार रोहितसह कोहली व राहुल संघात कायम ठेवले गेले आहेत. राहुलला चक्क इशान किशनसह यष्टीरक्षक म्हणून घेतले आहे.
भारताचा टी-20 संघ : हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, अक्सर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.
#TeamIndia squad for three-match T20I series against Sri Lanka.#INDvSL @mastercardindia pic.twitter.com/iXNqsMkL0Q
— BCCI (@BCCI) December 27, 2022
भारताचा एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंडया (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्सर पटेल, महंमद शमी, महंमद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.
#TeamIndia squad for three-match ODI series against Sri Lanka.#INDvSL @mastercardindia pic.twitter.com/XlilZYQWX2
— BCCI (@BCCI) December 27, 2022
धवनवर अन्यायच
भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर फलंदाज शिखर धवन याला श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून वगळले गेले आहे. जेव्हा नियमित कर्णधार उपलब्ध नव्हता तेव्हा धवनलाच नेतृत्व सोपवले गेले होते मात्र, आता त्यालाही बाहेरचा रस्ता दाखवताना पुढील वर्षीच्या विश्वकरंडक स्पर्धेसाठीही त्याचा विचार केला जाणार नसल्याचेच हे संकेत आहेत. त्यामुळे त्याच्यावर अन्याय झाल्याचे मत विक्रमादित्य सुनील गावसकर यांच्यासह अनेकांनी व्यक्त केले आहे.
भूवनेश्वरलाही इशारा
गेल्या वर्षभरापासून प्रमुख गोलंदाज दुखापतीने जायबंदी असताना अनुभवी वेगवान गोलंदाज भूवनेश्वर कुमार हा भारतीय संघाच्या गोलंदाजीची धुरा वाहात होता. त्याच्याकडून विश्वकरंडक, आशियाई अशा विविध स्पर्धांमध्ये सरस कामगिरी होत नव्हती. मात्र, त्याने अनेक सामन्यात चमकदार कामगिरी केली आहे. तरीही संघ निवडताना त्याच्या नावाचा विचार झाला नाही व एक प्रकारे त्यालाही बीसीसीआयने पुढील काळात त्याचे संघात स्थान नसेल, असा इशारा दिला आहे.
पंत देशांतर्गत स्पर्धेतच दिसेल
पदार्पणापासूनच बेजबाबदार पद्धतीने खेळ करणारा व संघाला गरज असेल तेव्हा हमखास अपयशी ठरत असलेल्या ऋषभ पंतचे संघातील स्थान कायम राहात होते व त्यावर प्रचंड टीकाही सुरू होती. यावेळी मात्र, कठोर निर्णय घेतला गेला असून श्रीलंकेविरुद्धच्या दोन्ही मालिकांसाठी त्याचा विचार झाला नाही व त्याने देशांतर्गत स्पर्धेत आपली तंदुरुस्ती तसेच कामगिरी सिद्ध करावी, असेही त्याला संकेत दिले गेल्याचे सांगितले जात आहे.
निवड केली कोणी
चेतन शर्मांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या संघाची निवड केल्याचे बीसीसीआयने जाहीररीत्या सांगितलेले नाही. त्यांनी केवळ आमच्या समितीने ही संघ निवड केल्याचे सांगितले व या समितीतील एकाही सदस्याच्या नावाचाही उल्लेख टाळला आहे. त्यामुळे अखेर ही निवड केली कोणी हा प्रश्न निर्माण झाला आहे. ऑस्ट्रेलियात नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वकरंडक तसेच गेल्या संपूर्ण मौसमात झालेल्या विविध मोठ्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीचे खापर निवड समितीवर फोडताना बीसीसीआयने ही संपूर्ण समितीच बरखास्त केली होती. तसेच त्याच दिवशी नव्या अध्यक्षांसह सर्व सदस्यांसाठी नव्याने अर्जही मागवले होते. त्यासाठी निवड समिती निवडण्यासाठीही गठन केलेली समिती आपली कार्यवाहीही करत होती मग अचानक जुन्या समितीवरच ही संघ निवड का सोपवली गेली, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.