IND vs SA Test Series : दक्षिण आफ्रिकेत ‘अशी ‘कामगिरी करणारा भारत ठरला पहिला आशियाई संघ…

South Africa vs India Test Series : केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा कसोटी सामना जिंकून भारताने इतिहास रचला. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने यजमान संघाचा सात गडी राखून पराभव केला. सेंच्युरियनमधील पहिली कसोटी एक डाव आणि 32 धावांनी जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-0 अशी अभेद्य आघाडी घेतली होती. त्यानंतर भारताने दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करत मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. टीम इंडियाला अद्याप दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही.
‘अशी ‘कामगिरी करणारा भारत पहिला आशियाई संघ..
केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर भारताने प्रथमच कसोटी सामना जिंकला आहे. 31 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली. केपटाऊनमधला हा केवळ भारताचाच नाही तर कोणत्याही आशियाई संघाचा हा पहिला विजय आहे. पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश आजपर्यंत येथे जिंकलेले नाहीत.
आफ्रिकेच्या चौथ्या मैदानावर भारताचा विजय…
भारताचा हा दक्षिण आफ्रिकेतील पाचवा कसोटी विजय आहे. 2006 मध्ये भारतीय संघ पहिल्यांदाच जिंकला होता. त्यानंतर टीम इंडियाने जोहान्सबर्गमध्ये यजमानांचा 123 धावांनी पराभव केला. केपटाऊन हे दक्षिण आफ्रिकेतील चौथे मैदान आहे जिथे भारताने विजय मिळवला आहे. यापूर्वी जोहान्सबर्ग, डर्बन आणि सेंच्युरियनमध्ये यश मिळाले आहे.
IND vs SA 2nd Test : टीम इंडियाची नवीन वर्षाची सुरुवात विजयाने, आफ्रिकेचा 7 गडी राखून केला पराभव…
1. जोहान्सबर्ग (साल 2006), 123 धावांनी विजय
2. डर्बन (साल 2010), 87 धावांनी विजय
3. जोहान्सबर्ग (साल 2018), 63 धावांनी विजय
4. सेच्युरिंयन (साल 2021), 113 धावांनी विजय
5. केपटाऊन (साल 2024), सात विकेटनी विजय
IND vs SA 2nd Test : भारताविरुद्ध केवळ 231 धावा झाल्या…
दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दोन्ही डावात मिळून केवळ 231 धावा केल्या. भारताविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दोन डावात दक्षिण आफ्रिकेनं केलेल्या सर्वात कमी धावा आहेत. या बाबतीत ते पाचव्या स्थानावर पोहचले आहेत. इंग्लंडचा संघ 2021 मध्ये दोन डावात केवळ 193 धावा करू शकला होता. 2018 मध्ये अफगाणिस्तानचा संघ बेंगळुरूमध्ये केवळ 212 धावा करू शकला होता, 2021 मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये न्यूझीलंडचा संघ केवळ 229 धावा करू शकला होता आणि 1986 मध्ये इंग्लंडचा संघ लीड्समध्ये दोन्ही डावात केवळ 230 धावाच करू शकला होता.
IND vs SA 2nd Test : दुसऱ्या सामन्यात काय घडलं मॅचमध्ये?
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय चुकीचा ठरला. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ 55 धावांवरच मर्यादित राहिला. त्यानंतर भारत 153 धावांवर ऑलआऊट झाला. सामन्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघांचा पहिला डाव आटोपला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी यजमानांनी दुसऱ्या डावात 173 धावा केल्या. त्यामुळे भारताला 79 धावांचे लक्ष्य मिळाले आणि भारतानं तीन गडी गमावून त्याने हे लक्ष्य गाठले.





