India vs New Zealand Test Series- न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पॅनिक बटण दाबले आहे. ते कृतीत (ॲक्शन मोड) आले असून आता ते कठोर निर्णय घेत आहेत. बेंगळुरू आणि पुण्यातील पराभवानंतर आता रोहित शर्माचा संघ मुंबईत पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. व्हाईटवॉश टाळण्यासाठी संघ पुरेपूर प्रयत्न करेल. आधी सीमिंग आणि नंतर फिरकी खेळपट्टीवर झालेल्या पराभवाने सर्वांनाच हैराण केले आहे. यानंतर गंभीरने मोठा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरू आणि त्यानंतर पुण्यातील 2 कसोटी गमावलेल्या टीम इंडियाला आता दिवाळीलाही सराव करावा लागणार आहे. 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ 2-0 ने पिछाडीवर आहे. तिसरी कसोटी मुंबईत होणार असून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी (डब्लूटीसी) ती अत्यंत महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे, मुंबईत असून बहुतांश खेळाडूंना यंदा दिवाळीसाठी घरी जाता येणार नाही. संघ व्यवस्थापनाने घेतला मोठा निर्णय… येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या मुंबई कसोटीसाठी सर्व खेळाडू तयारी करतील, असे संघ व्यवस्थापनाने म्हटले आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने वैकल्पिक प्रशिक्षण सत्रे न घेण्याचा निर्णय घेतला आहे. वृत्तानुसार, तिसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडिया 30 आणि 31 ऑक्टोबरला मुंबईत सराव करेल. या सत्रात सर्व खेळाडूंनी उपस्थित राहाणे अनिवार्य असणार आहे. त्यामुळे, कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रित बुमराह यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंनाही दिवाळीत विश्रांती मिळणार नाही. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातून मुंबई कसोटी भारतीय संघासाठी महत्त्वाची आहे. सलग 2 सामने गमावल्यानंतर भारताला आता पुढील 6 पैकी 4 कसोटी जिंकाव्या लागणार आहेत. 5 सामने ऑस्ट्रेलियात आहेत. अशा स्थितीत टीम इंडियाला शेवटचा सामना जिंकावाच लागेल. न्यूझीलंडचा संघ निर्भेळ यश मिळविण्यात यशस्वी ठरला तर भारताचे डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचणे कठीण होणार आहे. IND vs NZ 2nd Test : जे घडलं, ते अपेक्षित नव्हतं : कर्णधार शर्मा कशी असते प्रशिक्षण सत्राची पद्धत पर्यायी : पर्यायी प्रशिक्षण सत्र सहसा सामन्यापूर्वी आयोजित केले जाते. यामध्ये खेळाडूला प्रशिक्षण सोडण्याचा पर्याय आहे. ज्या खेळाडूंना प्रशिक्षणाची गरज आहे ते या सत्रात सहभागी होतात. उर्वरित खेळाडू हॉटेलमध्ये विश्रांती घेतात. सामन्यापूर्वी, खेळाडूंना ताजेतवाने ठेवण्यासाठी वैकल्पिक प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जातात. आवश्यक : हे प्रशिक्षण सत्र दोन सामन्यांमध्ये अंतर असताना आयोजित केले जाते. या सत्रात संघातील सर्व खेळाडूंनी उपस्थित राहणे बंधनकारक आहे. (सामान्यतः, प्रवास आणि सामन्यांच्या दुसऱ्या दिवशी प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जात नाहीत, जेणेकरून खेळाडू विश्रांती घेऊ शकतील.) IND vs NZ 2nd Test : टीम इंडियाचे तब्बल 12 वर्षांनी मायदेशात वाजले बारा, भारतात प्रथमच किवींचा मालिका विजय… भारतीय संघ मालिकेत 0-2 ने पिछाडीवर न्यूझीलंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ 0-2 ने पिछाडीवर आहे. पहिल्या 2 कसोटी सामन्यात किवीजकडून संघाचा पराभव झाला आहे. यापूर्वी टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश मिळविले होते.