Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीत सर्वसामान्यांचा मूड जाणून घेण्यासाठी अनेक सर्वेक्षणे करण्यात येतात. सर्वच सर्वेक्षणांमध्ये यावेळी भारतीय जनता पक्ष (भाजप) पुन्हा आघाडीवर असल्याचा दावा करण्यात आला.राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु आहे.
या निवडणुकीत सध्या सगळ्यात चर्चिला जाणारा मतदारसंघ म्हणून बारामतीकडं पाहिलं जात. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी “मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे”, असं वक्तव्य करून नव्या वादाची ठिणगी टाकलीय. त्यांच्या या वक्तव्यावरून सध्या राजकारण सुरु आहे.
#WATCH | Maharashtra Deputy CM Ajit Pawar along with his wife and NCP candidate from Baramati, Sunetra Pawar offer prayers at Shreemant Dagdusheth Halwai Ganpati temple, in Pune.
She will file her nomination today against NCP-SCP MP Supriya Sule. pic.twitter.com/bXu4iAyJQJ
— ANI (@ANI) April 18, 2024
अजित पवार म्हणाले होते की,‘आम्ही केलेल्या कामाचा तुम्हाला फायदा होईल. पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल, तेव्हा तो कुणामुळे झाला हे विसरू नका. विकासकामांसाठी पाहिजे तेवढा निधी देऊ. पण जसे आम्ही पाहिजे तेवढा निधी देतो, त्याप्रमाणे मतदान यंत्राची बटणे कचा कचा दाबा, म्हणजे मला निधी द्यायला बरे वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल’ असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनीही त्यांच्यावर निशाणा साधत निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अशात आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गपणती मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे सपत्नी दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या विधानावर स्पष्टीकरण दिल आहे.
अजित पवार म्हणाले…
‘कोणत्याही गोष्टीत ध ‘चा’ मा करू नये. मी गंमतीने हसत हसत तिथे बोलत होतो. तिथे सर्वजण वकिल आणि डॉक्टर होते. ती जाहीरसभा नव्हती. ती मर्यादित लोकांची, सुशिक्षित वर्गाची सभा होती. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांचे मान्यवर तेथे हजर होते.’
‘कोण पक्ष जाहीरनाम्यात सांगतो, आम्ही असं करणार तसं करणार. ते काही प्रलोभन दाखवणार का? विकासकामांना निधी देण्याचं कामच लोकप्रतिनिधींचं असतं. त्यामुळे आम्ही सांगायचा प्रयत्न करतो की आतापेक्षा जास्त निधी आणि जास्त विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आचारसंहितेचा भंग होता कामा नये याबद्दलची खबरदारी मी घेत असतो. छोट्या हॉलमधील वक्तव्य होतं.’
हे वाचाल का ? ‘आम्ही सर्व्हेमध्ये येत नाही, आम्ही थेट सरकार बनवतो.’ – भगवंत मान