मागील भागात आपण वेगवेगळ्या अॅलर्जीबद्दल काही माहिती घेतली. त्याचबरोबर अलर्जीचे अनेक वेगवेगळे प्रकार बघितले. अंतर्गत शरीरामधील बदलामुळे पण अॅलर्जीचा संभाव्य धोका होऊ शकतो. त्याचप्रमाणे त्वचेचे अनेक अॅलर्जीचे प्रकार आपण पाहत असतो.
सल्ला जरूर घ्यावा पण त्यासोबत अशा काही अॅलर्जीना घरगुती काही पदार्थ वापरणे ही योग्य ठरते. अॅलर्जी ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यावर कायमस्वरूपी उपाय नाही आहेत. त्यामुळे एकदा का आपल्याला कशाची अॅलर्जी आहे हे कळली तर आपणच योग्य ती काळजी घेतली पाहिजे, योग्य ती काळजी घेऊन सुद्धा एखाद्या वेळेस आपण लर्जीचा बळी ठरलो तर काही घरगुती उपायांचा वापर आपण केला पाहिजे. त्वचा अॅलर्जी ही सध्या खूप सर्वसामान्य गोष्ट आहे. पण कधी कधी ही गोष्ट धोकादायक पण ठरू शकते.
आपल्या घरातील रोजच्या वापरातील अनेक पदार्थ त्वचेच्या विविध समस्यांवर उपाय करण्यासाठी उपयुक्त ठरतात.घरगुती उपायांनी या समस्या सहज सुटू शकतात. स्किन अॅलर्जी ही जरी सर्वसामान्य समस्या असली तरीही ती झालेल्या व्यक्तीला खूप त्रास सहन करावा लागतो. कोणाला एखादा विशिष्ट पदार्थ खाल्यामुळे अॅलर्जी होते तर कोणाला एखाद्या सौंदर्य प्रसाधनांच्या (ब्युटी प्रॉडक्ट) वापरामुळे हा त्रास सहन करावा लागतो.
खूप खाज सुटणे, त्वचेवर फोड येणे, खाजवल्यामुळे त्वचेवर काळे डाग पडणे, त्वचेचा दाह होणे,त्वचा लाल पडणे, कधीकधी त्वचेला पाणीदार फोड येणे,असे परिणामही होतात. फूड अॅलर्जी आणि सौंदर्यप्रसाधनांमुळे होणारी लर्जी या दोन्हींमध्ये खूप फरक असला तरी त्याच्यामुळे होणारा त्रास तितकाच अधिक असतो. त्यापासून सुटका करण्यासाठी डॉक्टर किंवा स्पेशलिस्टशी बोलून, औषधे घेऊन लर्जी आटोक्यात आणता येते. पण कधीकधी घरगुती उपायांनीही या समस्यांचा त्रास कमी होऊ शकतो. काही फायदेशीर ठरणारे असे घरगुती उपाय आपण घरच्या पदार्थांच्या सोबतही करून पाहू शकतो. साधारणतः त्वचेच्या अलर्जीवर आपल्या घरातील काही पदार्थ वापरून आपण अटकाव आणु शकतो.
स्किन अॅलर्जीपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. बेकिंग सोडा स्वयंपाकघरातील असा एक पदार्थ आहे जो अनेक समस्यांवर लाभदायक ठरतो. पण बेकिंग सोडा वापरताना थोडी काळजी घेण्याची आवश्यकता असते. बेकिंग सोडा मध्ये सोडियम बायकार्बोनेट असते हे बर्यापैकी त्वचेचे अॅलर्जीला कमी करण्यास मदत ठरते. बेकिंग सोडा दुधात मिसळून पेस्ट बनवली आणि तीअॅलर्जीच्या जागेवर वापरली तर बराच फरक पडू शकतो. बेकिंग सोडा त्वचेत पीएच संतुलन राखण्यास मदत करतो. काही वेळेस तो वापरताना काळजी घेणे गरजेचे असते.
कोरफड
कोरफडीमधील औषधी गुणधर्मांच्या व्याप्तीबद्दल आपण सारेच जाणून आहोत. कोरफडीचा वापर अनेक गोष्टींत व अनेक प्रकारे केला जातो. कोरफडीचा ज्यूस देखील लोक तितक्याच प्रमाणात वापरतात. कोरफडीच्या ज्यूस मध्ये तांदळाचे पीठ घालून जर का त्याचा आवरण त्वचेवर लावलं तरी स्किन अॅलर्जीपासून सुटका मिळवण्यासाठीउपयुक्त ठरते. कोरफड एक रामबाम उपाय आहे. जर तुम्हाला अॅलर्जीमुळे शरीरावर खाज व त्वचा कोरडी पडण्याची समस्या उद्भवत असेल तर कोरफडीचा गर खाज व जळजळ अगदी सहज व झटपट रोखेल. कोरफडीचा गर टी ट्री ओईल मध्ये मिक्स केला तर शुष्क त्वचेला आलेल्या अॅलर्जीला उपयुक्त ठरतो.
टी ट्री ऑईल
टी ट्री ऑईलमध्ये अनेक ंटी-ऑक्सीडेंट्स असतात, जे त्वचेला झालेल्या लर्जीला आतून दुरूस्त करतात. त्यामधील ंटीबॅक्टेरिल आणि ंटी इन्फ्लामेट्री घटकांमुळे स्किन लर्जीचा त्रास दूर होण्यास मदत होते. त्वचेवरील लालसरपणा, रॅशेस हे सर्व दूर करायचे असेल तर दिवसभरात दोनवेळा तरी टी ट्री ऑईल जरूर लावावे. बाजारात हे ऑईल सहज उपलब्ध आहे. विशेष म्हणजे या ऑईलचे काही दुष्परिणाम होत नाहीत. हे ऑइल बर्याच गोष्टींसाठी गुणकारी असे ठरते. त्वचेवरील दाह, लालपणा, त्वचेचा कॅन्सर यापासून त्वचेचा बचाव करते. त्वचेला मऊपणा तसेच चमकही देते.
व्हिनेगर
अॅपल साइडर व्हिनेगरचाही उपयोग आपण करू शकतो. त्यामधील अनेक महत्वपूर्ण घटकांमुळे ते एक त्वचा संरक्षण उपयोगी असे बनले आहे. पल साइडर व्हिनेगरमधील अॅॅसिटिक सिड, विटामिन बी आणि सी हे आपल्या स्कीनवरील रॅशेस, लालसरपणा दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. अॅलर्जी आलेल्या भागाला कॉटनच्या मदतीने हे लावले असल्यास आपल्याला अॅलर्जीचा त्रास कमी होऊ शकतो तसेच रोज अंघोळ करताना पाण्यात थोडे अॅपल साइडर व्हिनेगर मिसळून त्या पाण्याने स्नान केल्यास लर्जी दूर होण्यास मदत होऊ शकते. हे लक्षात ठेवा की हे एक्स्टर्नल एप्लिकेशन्स आहेत त्वचेला बाहेरून लावण्यासाठी उपयुक्त असे.
नारळाचे तेल म्हणजेच रोजच्या वापरातले खोबरेल तेल हे त्वचेची निगा राखण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी आपण नेहमीच नारळाचे तेल वापरतो. नारळाच्या तेलातील पोषक घटकांमुळे केस गळणे, तुटणे, कोरडे होणे, पांढरे होणे अशा अनेक समस्या दूर होतात. हेच नारळाचे तेल त्वचेसाठीही खूप गुणकारी आहे. त्यामधील ंटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे त्वचेच्या समस्या सहजपणे दूर होतात. तसेच त्यातील मॉइश्चरायझिंग गुणांमुळे त्वचा मऊ आणि चमकदार बनते. एका वाटीत थोडे नारळाचे तेल घेऊन ते गरम करावे. तेल कोमट झाल्यावर ते त्वचेवर लावून हलक्या हाताने मालिश करावे व थोडा वेळ तसेच राहू द्यावे. नारळाच्या तेलामुळे स्कीन अॅलर्जी हळूहळू कमी होईल. लहान मुलांच्या त्वचेच्या अॅलर्जीमध्ये खोबरेल तेलाचा वापर खूप महत्त्वाचा ठरतो. खोबरेल तेलाच्या वापरामुळे लहान मुलांच्या त्वचेच्या लर्जीला आटकाव करता येतो.
खोबरेल तेलात बर्याच वेळा थोडीशी मुलतानी माती, अथवा तांदळाची पीठ वापर करू नहीं उपयोगात आणता येते. याचसोबत त्वचेवर बर्याच प्रमाणात त्वचा विकारही आपल्याला कायम दिसत असतात, वयात येणार्या मुलांना तर याचा प्रचंड त्रास होत असतो. पण अलीकडे वातावरणातील बदल तसेच सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक वापर यामुळे कोणत्याही वयात त्वचेवरती कोणतेही विकार उद्भवू शकतात. त्वचेवर साधारणता अंतर्गत बदलांमुळे येणार्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. जसे की पिंपल, पश्चूल, काही वेळा क्रस्ट अथवा मोठा दुखणारा असा सिस्ट जो लालसर असतो त्वचेवर कमी पण त्वचेच्या आत खोलवर असतो, काळे डाग,डोळ्यांत खालचे काळेपणा ओठांच्या कडेला येणारा कोरडेपणा, ओठांवरील साली जाणे, डोळ्यांची जळजळ होणे, त्वचेला काही ठिकाणी खाज सुटणे, कधीकधी तंग कपड्यांमुळे त्या ठिकाणी बारीक पाणीदार फोड येणे अथवा प्रचंड खास सुटणे.
अशा अनेक समस्या आजूबाजूला तसेच आपल्या स्वतःच्या बाबतीत घडत असतात. यासाठी योग्य पावडरी वापरणे कपड्यांची स्वच्छता नीट ठेवणे, शरीराची अंतर्गत स्वच्छता नीट असणे, आपल्या सौंदर्य प्रसाधनांची नीट माहिती असणे, ती वापरण्याची योग्य पद्धत आपल्याला माहित असणे, खाण्याच्या पदार्थांमध्ये विरुद्धभासी पदार्थ कोणते आहेत याची माहिती असणे, दोन पदार्थ एकत्र खाल्ल्यामुळे कोणते सिड्स आपल्या शरीरात बनतात ज्यामुळे अॅलर्जीला आपण आमंत्रण देत असतो याची माहिती असणे गरजेचे आहे. सामान्य नागरिकांना बर्याच वेळा आपल्या चेहर्यावर येणारा उंचवटा म्हणजे हा पिंपलच वाटत असतो आणि पिंपल ट्रीटमेंटच्या मागे सगळेजण लागलेले असतात. अशा वेळेस योग्य तज्ज्ञाांकडून आपल्या चेहर्यावर नक्की काय आहे त्यासाठी काय केले पाहिजे याचा आपण विचार केला पाहिजे. त्यानुसार त्याच्यावरती क्रिया केल्या पाहिजेत अथवा त्या योग्यतेचे सौंदर्य प्रसाधन वापरले पाहिजे. एकूणच सगळ्या गोष्टींचा विचार आता ग्राहकांनीच केला पाहिजे कारण बाजारातील वस्तू खरेदी करून आपण आपले पैसे आणि आपलेच वेळ देत असतो ज्यामुळे बर्याच वेळा आपला शरीराला अथवा त्वचेला तोटाच होत असतो. अॅलर्जीसारख्या गोष्टीसाठी माणसांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.