लाहोर – 2024 चा टी-20 विश्वकरंडक भारताने जिंकल्यानंतर विराट कोहलीने टी-20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता सर्वांच्या नजरा पुढील वर्षी पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीकडे लागल्या आहेत. यावर, आता बीसीसीआय आयसीसीला पाकिस्तानऐवजी दुबई किंवा श्रीलंकेत भारताचे सामने आयोजित करण्यास सांगेल, अशी माहिती आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने या विषयावर मौन सोडत विराट कोहली एकदा पाकिस्तानात आला की तो भारताचा आदरातिथ्य विसरून जाईल, असे म्हटले आहे. आफ्रिदीने एका मीडिया मुलाखतीत अनेक विषयांवर भाष्य केले. विराट कोहली पाकिस्तानमध्ये खेळत असल्याबद्दल तो म्हणाला, “मी म्हणेन की पाकिस्तानी चाहतेही विराट कोहलीवर भारतात तितकेच प्रेम करतात. पाकिस्तानच्या लोकांमध्ये विराट कोहलीची खूप क्रेझ आहे आणि त्याला खूप पसंत केले जाते. माझा आवडता खेळाडू आहे.” विराट कोहली स्वतःच्या क्लासमध्ये आहे पण त्याने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घ्यायला नको होती. आफ्रिदीच्या मते, विराट अजूनही लहान फॉरमॅटमध्ये खेळत राहू शकतो कारण तो फॉर्ममध्ये आहे, तंदुरुस्त आहे आणि दररोज ट्रेन करतो. त्याच वेळी, विराटच्या उपस्थितीने तो आपला अनुभव तरुणांसोबत शेअर करू शकला, कारण सर्व युवा खेळाडूंचा एकत्रित संघ शीर्ष स्तरावर तयार करणे कठीण होईल. विराट तरुणांना खूप काही शिकवू शकला असता, असे मत देखील आफ्रिदीने मांडले आहे. ICC Champions Trophy 2025 : नाही म्हणजे नाही! चॅम्पियन्स स्पर्धेसाठी BCCI चा पाकिस्तानात जाण्यास नकार; ICC ला सुचवले 2 पर्याय… क्रिकेटला राजकारणापासून दूर ठेवावे गेल्या वर्षी पाकिस्तानमध्ये झालेल्या आशिया कप मालिकेतही भारत खेळायला गेला नव्हता. त्यानंतर भारताचे सामने श्रीलंकेत झाले. आता चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्येही अशीच परिस्थिती आहे. यावर आफ्रिदीने म्हटले की, मला वाटते की क्रिकेट स्पर्धा, मालिका, या गोष्टी राजकारणापासून दूर ठेवल्या पाहिजेत. एकमेकांच्या देशात जाऊन क्रिकेट खेळण्यापेक्षा काहीही चांगले होणार नाही. या नात्यापेक्षा सुंदर काही असू शकत नाही.