Nora Fatehi : अभिनेत्री नोरा फतेहीच्या ‘सरके चुनर तेरी सरके’ या गाण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे. अभिनेत्री नोरा फतेहीला आयोगासमोर हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आली होती. त्यांनतर नोराने महिला आयोगासमोर हजर राहत आपले म्हणणे मांडले आहे. यापूर्वी संजय दत्त देखील आयोगासमोर हजर झाला होता. संबंधित गाण्याबाबत त्याने लेखी उत्तर देत दिलगिरी व्यक्त केली होती. ‘के.डी: द डेव्हिल’ या दाक्षिणात्या चित्रपटातील ‘सरके चुनर तेरी सरके’ या गाण्यामुळे वादाला तोंड फुटले होते. या गाण्याचे वादाचे मुख्य कारण म्हणजे गाण्यातील कथित अश्लील आणि डबल मीनिंग लिरिक्स. (Nora Fatehi ) तसेच बोल्ड डान्स स्टेप्समुळे हे गाणे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. सोशल मीडियावर अनेकांनी या गाण्यावर टीका करत ते “वल्गर” असल्याचे संबोधले होते. नोरा फतेहीने राष्ट्रीय महिला आयोगासमोर आपली बाजू मांडत मोठा खुलासा केला. तिने “मी केवळ एका परिस्थितीत सापडले होते आणि कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. एक कलाकार म्हणून मला माझी जबाबदारी पार पाडावी लागेल. मी माफी मागते आणि आम्ही सर्व काही लेखी स्वरूपात दिले आहे.” समाजाने आम्हाला दिलेल्या प्रेमाची परतफेड करणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे मी काही अनाथ मुलींच्या शिक्षणासाठी निधी देण्याचा निर्णय घेतला असल्याची ती म्हणाली. नोरा फतेहीच्या आधी राष्ट्रीय महिला आयोगाने संजय दत्तला बोलावले होते. २७ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत अभिनेत्याने गाण्याबद्दल माफी मागितली होती. त्याने सामाजिक कल्याण आणि महिला सक्षमीकरणात योगदान म्हणून ५० आदिवासी मुलींच्या शिक्षणासाठी निधी देण्याचे आश्वासनही दिले आहे. नेमकं प्रकरण काय आहे? (Nora Fatehi) महिलांविषयी आक्षेपार्ह आणि अश्लील आशय असल्याचा आरोप या गाण्यावर करण्यात आला होता. या प्रकरणात काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केली होती. राष्ट्रीय महिला आयोग (NCW) आणि NHRC यांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे. नोराने व्हिडिओ शेअर करत मागितली होती माफी (Nora Fatehi) गाण्यावरुन वाद वाढल्यानंतर नोरा फतेहीने स्पष्टीकरण देत माफी मागितली होती. तिच्या म्हणण्यानुसार, गाण्याचा हिंदी व्हर्जन रिलीज होईल याची तिला पूर्ण कल्पना नव्हती आणि अंतिम व्हर्जनला तिने मान्यता दिली नव्हती, असा खुलासाही तिने केला होता. हेही वाचा : SBI Strike Alert : सलग ४ दिवस राहणार बँका बंद? स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांची होणार गैरसोय?