Pune : “मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काम केलं, तिथं शिकल्यावर तर कुठेही राजकारण…..”; जेएनयुच्या कुलगुरुंचे विधान चर्चेत

पुणेः महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्मृति व्याख्यानात ‘नव्या युगातील भारतीय समाज : संधी आणि आव्हाने’ या विषयावर जेएनयूच्या कुलगुरू डॉ शांतिश्री पंडीत आपले मतं व्यक्त केले. यावेळी बोलताना त्यांनी मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काम केलं आहे.
तिथं शिकल्यावर तर कुठेही राजकारण करता येईल, असे विधान पंडित यांनी यावेळी बोलताना केले आहे. त्यांच्या या विधानाची जोरदार चर्चा केली जात आहे. दहा वर्षे ‘आपले’ सरकार असतानाही डाव्यांची परिसंस्था सुरू असून, आपल्यालाही स्वतंत्र विचारवंत आणावे लागतील, असे देखील त्या पुढे म्हणाल्या.
डाव्यांचं कथन अतिशय मजबूत आहे. डावे लोकचं क्रांतिकारी असू शकतात, असे आजपर्यंत पुढे आणण्यात आले. वासुदेव बळवंत फडकेही क्रांतिकारक होते, हे लोकांसमोर आणलं गेले पाहिजे. पुण्यासारख्या बुद्धिवंतांच्या शहरातून हे कथन सुरू झालं पाहिजे. त्यासाठी लेखन करावं लागेल, बोलावे लागेल, असे पंडित यांनी सांगितले.
मी उघडपणे सांगते, मी संघाची
जेएनयूमध्ये आजपर्यंत एकही स्त्री कुलगुरू झाली नाही. ही परंपरा संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बदलली आहे. त्यांनी नारीशक्तीबाबत जे बोलले, ते करून दाखवले. अनेक लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वापर करून पदे मिळवतात आणि नंतर लपवाछपवी करतात. पण मी उघडपणे सांगते मी उघडपणे सांगते मी संघाची आहे, असे विधान पंडित यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाची जोरदार चर्चा केली जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली राज्यघटना आज धोक्यात आली आहे. धार्मिक लोकसंख्या असमतोल हे त्याचे कारण आहे. हिंदू बहुसंख्याक असेपर्यंतच भारत धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही देश राहणार आहे, असल्याचे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. त्यांच्या वरील विधानामुळे मोठी चर्चा होताना दिसत आहे.





