Kevin Pietersen – टी-२० विश्वचषकच्या फायनल समन्याबाबत क्रिकेट तज्ज्ञांकडून वेगवेगळा अंदाज लावला जात आहे. पहिल्या सेमीफायनल सामन्यात बुधवारी सिडनी क्रिकेट मैदानावर न्यूझीलंडचा सामना पाकिस्तानशी सामना झाला. या सामन्यात पाकिस्तानने ७ गडी राखून न्यूझीलंड संघाचा पराभव केला. त्यानंतर आता गुरुवारी ऍडिलेडच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल होईल अशा अनेक भविष्यवाण्या केल्या जात आहेत. मात्र, इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनने फायनलबाबत वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे.
#INDvsENG | सेमीफायनल अगोदरच भारतीय संघ मोठ्या अडचणीत, विराट कोहलीला दुखापत!
विश्वचषकच्या अंतिम फेरीत इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात सामना होईल, असे मत पीटरसनने ( Kevin Pietersen ) व्यक्त केले आहे. त्याने बेटवे ब्लॉगवर लिहिले की, “मला वाटते की क्रिकेट जगताला पाकिस्तान आणि भारत यांच्यात अंतिम सामना पाहायचा आहे, मात्र इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान असा अंतिम सामना होण्याची जास्त संधी आहे, अशी भविष्यवाणी पीटरसनने केली आहे.
पीटरसनने ( Kevin Pietersen ) पुढे म्हटले की, “ऍडिलेड ओव्हलमध्ये होणाऱ्या सेमीफायनल सामन्यात मला वाटते की इंग्लंड भारताला हरवेल. कारण इंग्लंड संघाने चांगले क्रिकेट खेळले आहे. मात्र, हे सर्व होण्यासाठी विराट कोहलीने एक दिवस त्याच्या फॉर्ममध्ये येऊ नये असे मला वाटते.” विराट कोहली यंदाच्या विश्वचषकात चांगल्या लयीत खेळात आहे. त्याने आत्तापर्यंत ५ सामन्यांमध्ये २४६ धावा केल्या आहेत. त्यामुळे आता महत्वाच्या सामन्यात विराट कोहलीची कामगिरी भारतीय संघासाठी गरजेची असणार आहे.
सॅम करनची कामगिरी पाहता तो भारतीय संघासाठी खतरा ठरू शकतो, असेही पीटरसनने म्हटले आहे. पीटरसनने ( Kevin Pietersen ) लिहिले की, “डाव्या हाताचे गोलंदाज टी-२० मध्ये नेहमीच प्रभावी ठरतात. कारण त्यातुलनेत उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध क्रिकेट खेळायला जास्त अडचणी येत नाहीत. जेव्हा आम्ही २०१० मध्ये टी-२० विश्वचषक जिंकला, तेव्हा रायन साइडबॉटम आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरला होता. त्यावेळी डावखुऱ्या गोलंदाजाला भरपूर सीम आणि स्विंग मिळाले होते. त्याचप्रमाणे सॅम करनही इंग्लंडसाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.”