IND vs PAK : ‘पाकिस्तानविरुद्ध खेळण्याचा निर्णय…’, भारत-पाक सामन्यावर सुनील गावस्करांचं मोठं वक्तव्य

Ind vs Pak Asia Cup 2025 Match Controversy : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2025 चा बहुप्रतिक्षित सामना आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. मात्र, हा सामना आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. भारतीय चाहत्यांमध्ये या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे. माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांनी यासंदर्भात स्पष्ट केले की, खेळाडू फक्त बीसीसीआय आणि भारत सरकारच्या आदेशांचे पालन करत आहेत. सामना खेळायचा की नाही, हा निर्णय घेण्यात खेळाडूंची कोणतीही भूमिका नाही.
खेळाडू फक्त आदेशांचे पालन करतात –
आज तकशी खास बातचीत करताना सुनील गावस्कर म्हणाले, “खेळाडू फक्त आदेशांचे पालन करतात. पाकिस्तानविरुद्ध खेळण्याचा निर्णय बीसीसीआय आणि भारत सरकारने घेतला आहे.” हा सामना अशा वेळी होत आहे, जेव्हा काही महिन्यांपूर्वी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला करण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले होते.
सोशल मीडियावर बहिष्काराची मागणी –
एशिया कप भारत-पाक मुकाबले पर सुनील गावस्कर EXCLUSIVE #AsiaCup #INDvsPAK #CricketNews #ATVideo | @vikrantgupta73 pic.twitter.com/rBSgR9QkSG
— AajTak (@aajtak) September 13, 2025
सोशल मीडियावर #BoycottIndvsPak सारखे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. अनेक माजी क्रिकेटपटू, पत्रकार आणि इतर व्यक्तींनी चाहत्यांना या सामन्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. भारत-पाकिस्तान सामन्यांना नेहमीच प्रचंड उत्साह असतो, पण या गट साखळी सामन्यासाठी दुबईत तिकीट विक्रीत मंदी दिसून येत आहे.
हेही वाचा – IND VS PAK : “आपण त्यांना दोष देऊ शकत नाही…”; भारत-पाकिस्तान सामन्यावर सुनिल शेट्टीचं मोठं वक्तव्य
तिकीट विक्रीला सुरुवात होऊन दहा दिवसांहून अधिक काळ लोटला, तरी स्टेडियमच्या जवळपास निम्म्या जागा रिकाम्या आहेत. तिकिटांची सुरुवातीची किंमत 99 अमेरिकी डॉलर आहे, तर प्रीमियम पॅकेजची किंमत 4 लाख रुपयांहून अधिक आहे. चाहते या सामन्याबाबत संकोच करत असल्याचे दिसते, जे अलीकडील घटना आणि विरोधाच्या आवाहनांचे प्रतिबिंब आहे.
हेही वाचा – IND vs PAK : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का, ‘या’ स्टार फलंदाजाला झाली दुखापत
दोन्ही संघांचे लक्ष मैदानावर –
रविवारी होणाऱ्या या सामन्यापूर्वी दोन्ही संघांचे लक्ष पूर्णपणे मैदानावरील कामगिरीवर आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आशिया कपची सुरुवात दमदारपणे केली असून, संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध विक्रमी धावांचा पाठलाग करत विजय मिळवला आहे. कपिल देव यांसारख्या दिग्गजांनी संघाला स्मरण करून दिले आहे की, त्यांनी आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करावे आणि मैदानावर “आपले काम” करावे.





