Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा भाजपला मोठा धक्का; गोरे करणार शिंदेसेनेत प्रवेश, महाराष्ट्रात खळबळ
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात सध्या पक्षप्रवेशांना मोठा वेग आला असून सातारा जिल्ह्यात भाजपला मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात सध्या पक्षप्रवेशांना वेग आला असून सातारा जिल्ह्यातून भाजपला मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शेखर गोरे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. शेखर गोरे यांच्या या निर्णयामुळे भाजप नेते आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर नवे राजकीय आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics)
विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांच्या विजयासाठी शेखर गोरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे आता त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्यास माण-खटावच्या राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics)
मुख्यमंत्र्यांवर नाराज असल्याची चर्चा
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला नसल्याने शेखर गोरे नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू होती. या नाराजीनंतर त्यांनी आपली पुढील राजकीय दिशा ठरवल्याचे बोलले जात आहे. (Maharashtra Politics)
शेखर गोरे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर भाजपच्या गोटात तसेच माण-खटाव मतदारसंघातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (Maharashtra Politics)
2029 च्या निवडणुकीत समीकरणं बदलणार?
जयकुमार गोरे यांच्या विजयासाठी विधानसभा निवडणुकीत मोलाची भूमिका बजावणारे शेखर गोरे आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने आगामी 2029 च्या विधानसभा निवडणुकीत माण-खटावमधील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)
शेखर गोरे यांच्या पक्षप्रवेशामुळे माण आणि खटाव तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढण्याची शक्यता आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही या पक्षप्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. (Maharashtra Politics)
एकेकाळी जयकुमार गोरे यांच्या विजयासाठी खांद्याला खांदा लावून काम करणारे शेखर गोरे आता वेगळी राजकीय वाट निवडत असल्याने सातारा जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Maharashtra Politics)






