नवी दिल्ली :– केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्यासह बिहार भाजपच्या नेत्यांनी बुधवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना राज्यातील दारूबंदी धोरणाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. बनावट दारूच्या बेकायदेशीर विक्रीमुळे वारंवार मृत्यू होतात. हे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे दारूबंदीच्या धोरणाचा फेरविचार करण्याची वेळ आली आहे असे अनेक भाजप नेत्यांनी म्हटले आहे.
गिरीराज सिंह यांनी संसदेबाहेर पत्रकारांना सांगितले की, कुमार यांनी या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलावून त्यानुसार निर्णय घ्यावा. जर एखादे धोरण यशस्वी झाले नाही तर त्याचा पुनर्विचार व्हायला हवा, असे ते म्हणाले.
पाटलीपुत्रचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री राम कृपाल यादव यांनी सिंह यांच्या मताचे समर्थन केले. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी दारूबंदी हा वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय बनवू नये. त्यांनी एकतर त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी किंवा राजीनामा द्यावा, असेही ते पुढे म्हणाले.
Nepal Bus Accident : नेपाळमध्ये भीषण अपघात, बस उलटल्याने 13 जणांचा जागीच मृत्यू
बिहारमधील सारण जिल्ह्यात कथितरित्या बनावट दारू प्यायल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे, या पार्श्वभूमीवर त्यांनी ही सुचना केली आहे.