थंडी सुरू झाली आहे. विषेशतः आपल्याकडे उत्तर भारतात दरवर्षी कडाक्याची थंडी जाणवते. तुमच्याकडे कार असेल आणि या मोसमात सतत तुम्हाला कारने प्रवास करावा लागणार असेल तुम्हाला या बातमीत असे पाच मार्ग सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमची कार खराब होण्यापासून वाचवू शकता. तसेच, थंडीच्या मोसमात कोणत्याही प्रकारच्या त्रासापासून तुम्ही स्वतःला दूर ठेवू शकता. चला, जाणून घेऊया.
बॅटरीची काळजी घ्या
हिवाळ्यात कारच्या बॅटरीचीही काळजी घ्यावी लागते. थंडीमुळे गाडीचे इंजिन थंड पडून गाडी सुरू होण्यास त्रास होतो. त्यामुळे, बॅटरी योग्यरित्या कार्यरत असणे आवश्यक होते. कारमधील बॅटरी खूप जुनी झाली असेल, तर हिवाळा सुरू होण्यापूर्वी कारमध्ये नवीन बॅटरी लावणे चांगले.
फॉग लाईट्स इन्स्टॉल करा
सध्या अनेक गाड्यांमध्ये फॉग लाईट लावलेले नसतात. किंमत कमी ठेवण्यासाठी कार निर्माते कारच्या स्वस्त व्हेरियंटमध्ये ही ऑफर करत नाहीत. पण हिवाळ्यात त्यांची जास्त गरज असते. हे कारच्या पुढील बंपरच्या तळाशी इन्स्टॉल केले जातात, जे धुक्याच्या वेळी रस्ता प्रकाशित करतात. त्यामुळे चालकाला गाडी चालवणे सोपे होते. जर तुमच्या कारमध्ये फॉग लाइट्स नसतील तर थंडी सुरू होण्यापूर्वी ते नक्कीच लावून घ्या.
वाइपरकडे लक्ष द्या
थंडीत जेव्हा रस्त्यावर काहीही दिसत नाही, तेव्हा वाइपर वापरणे चांगले. गाडीत हिटर चालू असल्यामुळे आणि बाहेर थंडीमुळे कधी कधी काचेवर वाफ जमा होते. त्यामुळे गाडीचे वायपर व्यवस्थित काम करणं गरजेचं होतं. असे करण्यात अयशस्वी झाल्यास कार चालविताना समस्या उद्भवू शकतात. कारचे वाइपर योग्यरित्या काम करत नसल्यास, ते बदलणे चांगले.
रिफ्लेक्टर टेप लावा
थंड हवामानात विषेशतः पहाटेच्या वेळी धुके असताना, रस्त्यावर वाहन चालवताना दृश्यमानता खूपच कमी होते. अशावेळी गाडी चालवणे अवघड होऊन बसते. काहीवेळा दृश्यमानता इतकी कमी होते की रस्त्याच्या पुढे किंवा मागे वाहनाची उपस्थिती आपल्याला जाणवत नाही. अशावेळी अपघाताचा धोकाही वाढतो. धुक्यात कारला रिफ्लेक्टर टेप लावल्यास प्रकाश परावर्तित होऊन अपघाताचा धोका कमी होतो.
थंडी सुरू होण्यापूर्वी सर्व्हिसिंग करून घ्या
थंडीच्या वातावरणात प्रवास करताना गाडी बिघडली तर त्याचा त्रास अधिक होतो. अशा परिस्थितीत मदत सहजासहजी मिळत नाही. त्यामुळे हिवाळ्यापूर्वी कारची सर्व्हिसिंग करून घेणे चांगले. असे केल्याने फायदा असा होईल की कारमध्ये काही कमतरता असेल तर ती कळेल आणि कालांतराने ती दूर होईल.