बारामती -मोटार विक्रीच्या जुन्या व्यवहाराच्या कारणावरून बारामतीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचे जबरदस्तीने स्कॉर्पिओ गाडीतून अपहरण करीत त्याचा रस्सीने गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तालुका पोलिसांनी चौघांना अटक केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी मनोज ऊर्फ बंडू रामदास मुळे (रा. तराळवस्ती, टेंभुर्णी, जि. सोलापूर) व त्याचा अन्य एक साथीदार रत्नदीप पुजारी हे दोघे अद्याप फरार आहेत.
आविष्कार दळवी, आदनान देशमुख, अंकुश ऊर्फ बालाजी जाधव आणि दत्ता सपाटे (सर्व रा. करमाळा, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, नितीन बाळासाहेब कदम (वय 23, रा. वेणेगाव, जि. सोलापूर), असे अपहरण झालेल्या युवकाचे नाव आहे.
यासंबंधी मनोज ऊर्फ बंडू रामदास मुळे (रा. तराळवस्ती, टेंभुर्णी) याच्यासह अन्य पाच जणांवर गुन्हा दाखल झाला. होता.नितीन याचे (दि.21) बारामतीतील एका जीममधूनअपहरण करीत त्याचा गळा आवळत बेशुद्धावस्थेत त्याला माळशेज घाटात टाकण्यात आले होते.
एमएच 42 एक्स 9296 या क्रमांकाची स्कार्पिओ त्याने ओळखीच्या मनोज ऊर्फ बंडू मुळे याला विकली होती. ऑगस्ट 2020 मध्ये नोटरीद्वारे व्यवहार केला होता. गाडीमुळे याच्या ताब्यात दिली, परंतु मुळे याने व्यवहार ठरल्याप्रमाणे पूर्ण पैसे दिले नाहीत. त्यामुळे
फिर्यादीने टीटी फॉर्मवर सह्या केल्या नाहीत. टेंभुर्णी पोलीस ठाणे व सोलापूरच्या अधीक्षकांना विरोधात अर्ज दिला. त्याचा त्याला राग आला होता. त्यामुळे तो नितीनला धमकावत होता. यातून अपहरणाची ही घटना घडली होती. पोलीस निरीक्षक महेश ढवाण अधिक तपास करीत आहेत.