Anil Chaudhary Reveals : विराट-गंभीर वादामागचे खरे कारण अखेर समोर! माजी आंतरराष्ट्रीय अंपायर अनिल चौधरींचा मोठा खुलासा
Anil Chaudhary Reveals : भारताचे माजी आंतरराष्ट्रीय पंच अनिल चौधरी यांनी कोहली-गंभीरच्या वादामागचे मुख्य आणि खरे कारण उघड केले आहे.

Ex Umpire Anil Chaudhary Reveals Real Reason Behind Kohli Gambhir IPL Fights : भारतीय क्रिकेट वर्तुळात आणि विशेषतः आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक गाजलेला वाद म्हणजे विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील मैदानातील रणसंग्राम. या दोघांमधील संघर्षामागे नक्की कोणते वैयक्तिक वैर होते का? याबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये नेहमीच उत्सुकता राहिली आहे. मात्र, आता भारताचे माजी आंतरराष्ट्रीय पंच अनिल चौधरी यांनी या वादामागचे मुख्य आणि खरे कारण उघड केले आहे. हा वाद कोणत्याही वैयक्तिक वैरामुळे नसून उत्तर भारतीय क्रिकेट संस्कृतीतून आलेल्या आक्रमक वृत्तीचा परिणाम होता, असे त्यांनी स्पष्ट केले.
“आक्रमकता काढून घेतली तर खेळ बिघडेल!”
जिओ स्टारच्या ‘चिकी सिंगल्स’ या कार्यक्रमात बोलताना अनिल चौधरी म्हणाले की, दिल्ली आणि उत्तर भारतातील क्रिकेटपटूंच्या रक्तातच आक्रमकता असते. “मी स्वतः स्थानिक क्रिकेट खेळलो आहे. उत्तर भारतातील बहुतांश खेळाडू याच आक्रमक जोशातून आपला सर्वोत्तम खेळ करतात. जर त्यांच्यातील ही आक्रमकता काढून घेतली, तर त्यांच्या कामगिरीवर परिणाम होतो. त्यामुळे मैदानावर घडणारे हे वाद वैयक्तिक नसून खेळाच्या आवेशाचा भाग असतात; अर्थात या आक्रमकतेलाही एक मर्यादा असायला हवी.”
विराटच्या मनात द्वेष नसतो!
Jamnapaar Swag! 😎
Umpire Anil Chaudhary shares his memories of stepping in to calm Kohli-Gambhir’s situation.
Watch the latest episode of #CheekySingles! LIVE NOW on JioHotstar 👉https://t.co/0OExmJw2km pic.twitter.com/sTqtV7jE3m
— Star Sports (@StarSportsIndia) July 31, 2026
विराट कोहलीबद्दल बोलताना चौधरी यांनी त्याचे समर्थन केले. लहाणपणापासून विराटच्या सामन्यांमध्ये अंपायरिंग केल्याचा अनुभव सांगताना ते म्हणाले, “विराट मैदानावर जितका आक्रमक दिसतो, तितकाच तो दिलदार आहे. अचूक निर्णय दिल्यावर तो अंपायरला थम्स-अप देतो, तर ओव्हरच्या ब्रेकदरम्यान खांद्यावर हात ठेवून हसतमुखाने संवाद साधतो. असे खेळाडू क्रिकेटला अधिक रोमांचक बनवतात.”
आयपीएल २०१३ मध्ये आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्यात पहिल्यांदा विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर दहा वर्षांनंतर आयपीएल २०२३ मध्ये एलएसजी विरुद्ध आरसीबी सामन्यात विराट आणि गंभीर पुन्हा एकमेकांशी भिडले होते. मात्र, अंपायर अनिल चौधरी यांच्या या खुलाशानंतर क्रीडाप्रेमींचा या वादाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलू शकतो.





