पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीचं ( Shahid Afridi ) मोठं वक्तव्य समोर आलं आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे आयसीसी ( ICC ) भारताची बाजू घेत असल्याचा आरोप केला आहे. आफ्रिदी म्हणाला की, आयसीसी कोणत्याही मार्गाने भारताला उपांत्य फेरीत नेण्याचा प्रयत्न करत आहे. भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यानंतर आफ्रिदीचे वक्तव्य समोर आले आहे. या सामन्यात टीम इंडियाने डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशचा ५ धावांनी पराभव केला होता.
#T20WorldCup2022 | विराट कोहली चांगला खेळूनही गंभीर ‘या’ कारणामुळे करतोय त्याच्यावर टीका
आफ्रिदीने ( Shahid Afridi ) भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याचा संदर्भ देत आयसीसीच्या वृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. एका पाकिस्तानी चॅनलशी संवाद साधताना तो म्हणाला की, ” पावसामुळे ऍडिलेडचे मैदान किती ओले होते ते तुम्ही पाहिले आहे. असे असतानाही भारत-बांगलादेश सामना पुन्हा सुरु करण्यात आला. यातून आयसीसी एकप्रकारे भारतीय क्रिकेट संघाला मदत करत असल्याचं दिसत होतं. त्याचबरोबर भारतीय संघाने कोणत्याही प्रकारे सेमीफायनलमध्ये पोहोचावे, अशीआयसीसीची इच्छा आहे.”
आफ्रिदीने ( Shahid Afridi ) पुढे म्हटले की, “मला वाटते की आयसीसीचा कल टीम इंडियाच्या बाजूने अधिक आहे. भारत-पाकिस्तान सामन्यात जे पंच होते तेच बांगलादेशविरुद्धही होते. त्यामुळे त्यांना सर्वोत्कृष्ट पंचांचा पुरस्कार दिला पाहिजे.” पाकिस्तानच्या खराब कामगिरीचा आणि भारतीय संघाचा चांगल्या कामगिरीचा राग तो आयसीसीवर काढत असल्याचे आफ्रिदीच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते आहे.
पाकिस्तान संघ टी-२० विश्वचषकातून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. कारण भारताने त्यांच्या शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकाने नेदरलँड्सचा पराभव केला तर पाकिस्तान आणि बांगलादेश संघ थेट विश्वचषकातून बाहेर होतील. मात्र आफ्रिका किंवा भारतापैकी एकाचा पराभव झाला तरच पाकिस्तानला सेमीफायनलची संधी मिळणार आहे. त्यामुळेच आफ्रिदी ( Shahid Afridi ) आपल्या संघाच्या खराब कामगिरीला लपवण्यासाठी इतरांकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.