Maharashtra Politics : महाराष्ट्रावर शोककळा..! माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांचे निधन
Maharashtra Politics : शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघाच्या माजी आमदार व 'गोकुळ'च्या माजी संचालिका संजीवनीदेवी गायकवाड यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने कोल्हापूरच्या राजकीय व सहकार क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.

Maharashtra Politics : शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार संजीवनीदेवी संजयसिंह गायकवाड यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. (Maharashtra Politics)
सरूड येथील सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या संजीवनीदेवी गायकवाड यांनी आपल्या पती तथा माजी आमदार दिवंगत संजयसिंह गायकवाड यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्यात खंबीर साथ दिली. (Maharashtra Politics)
पतीच्या निधनानंतर राजकारणात प्रवेश
सन २००० मध्ये संजयसिंह गायकवाड यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली. अत्यंत कठीण परिस्थितीत कुटुंबीय, कार्यकर्ते आणि मतदारांच्या आग्रहास्तव संजीवनीदेवींनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. जनतेने त्यांना मोठा प्रतिसाद देत पोटनिवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी केले. त्यानंतर त्यांनी सुमारे चार वर्षे आमदार म्हणून काम केले. (Maharashtra Politics)
विकासकामांवर दिला भर
आमदारकीच्या कार्यकाळात संजीवनीदेवींनी शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील विविध विकासकामांना गती दिली. ग्रामीण भागातील लोकांच्या प्रश्नांशी त्यांचा जवळचा संबंध होता. (Maharashtra Politics)
राजकारणासोबतच त्यांनी सहकार क्षेत्रातही महत्त्वाचे योगदान दिले. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) येथे त्यांनी तब्बल १० वर्षे संचालिका म्हणून काम पाहिले. ग्रामीण भागातील संस्थांची उभारणी, रोजगाराच्या संधी आणि स्थानिक विकासासाठी त्यांनी प्रयत्न केले. (Maharashtra Politics)
सामान्य कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचं नातं
राजकीय क्षेत्रात मोठी जबाबदारी सांभाळूनही संजीवनीदेवी यांचा स्वभाव अत्यंत साधा आणि नम्र असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जाते. तळागाळातील कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांशी त्यांनी कायम जिव्हाळ्याचे संबंध ठेवले. (Maharashtra Politics)
त्यांच्या निधनाने गायकवाड कुटुंबीयांसह शाहूवाडी-पन्हाळा परिसरातील कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात गोकुळचे माजी संचालक करणसिंह गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य योगीराज गायकवाड, इंद्रजीत गायकवाड हे तीन पुत्र, सुना, नातवंडे आणि मोठा आप्तपरिवार आहे. (Maharashtra Politics)
Maharashtra Politics : शिंदेच टेन्शन वाढलं ! 6 खासदारांच्या बंडखोरीबाबत सुप्रीम कोर्टाचं मोठं पाऊल





