Raju Shetty | शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी उच्च न्यायालयाचा एक रक्कम एफ आर पी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, कारखान्यांनी विलंब केला त्या कारखान्याने व्याजाचे पैसे द्यावे, या मागणीसाठी त्यांनी साखर आयुक्तांची भेट घेतली. जवळपास 7 हजार कोटी एफ आर पी थकित असल्याचे समोर आले आहे. आम्ही आठ दिवसांची वाट बघू नाही तर आम्ही इथ येऊ आणि सगळी रक्कम वसूल करू, असा इशारा शेट्टी यांनी माध्यमांशी बोलताना दिला. याविषयी केंद्र सरकारला अधिकार आहे हायकोर्टाला अधिकार नाही, नवीन नियम करण्याचा अधिकार नाही. 2019 पासून अनेक साखर कारखान्यांनी आरएसएम हिशोब दिले नाहीत, मग हे साखर आयुक्त काय करतात इथे बसणारे सगळे हजामत करतात का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच बैठकाही होत नाहीत, यामुळे आता समिती स्थापन करण्यासाठी आंदोलन करावे लागले, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. सरकार कारखानदारचे बटिक झाले आहेत काय असे वाटतेय, असे म्हणत त्यांनी सरकारव ताशेरे ओढले. प्रत्येक कारखान्याला त्याच्या कार्यक्षेत्राच्या 25 किलोमीटर क्षेत्रात दुसऱ्या कारखान्याचे लायसन मिळणार नाही अशा प्रकारचे संरक्षण देण्यात आले. तशी परवानगी दिली तर कारखाने अडचणीत येतील, पण या परवानगी कोणी दिली. एवढा विचार करताना अक्कल कुठे ठेवली होती, असा खोचक सवालही त्यांनी विचारला आहे. कोरटकरवर भाष्य शेट्टी यांनी कोरटकर विषयी देखील भाष्य केले. मुख्यमंत्री म्हणतात कोरटकर चिल्लर माणूस आहे, तर हा चिल्लर माणूस एक महिना का सापडत नव्हता, कोरटकर सोलापूरकर अशी माणसे वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी पेरली गेली आहे, असा दावा त्यांनी केला. शेतकरी एफ आर पी मिळत नाही. सोयाबीन खरेदी केले जात नाही. एक ना अनेक प्रश्न आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. दंगली घडत आहेत. असे प्रश्न असताना लोकांना लोकांची माथी भडकवायची आपलं अपयश लपवायचं हेच याच्या पाठीमागचा कारण असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.