Sharad Pawar : तुमचा निरोप उद्धव ठाकरेंंना देतो; मराठी भाषा सक्तीवर शरद पवारांचे उत्तर, उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ; नेमकं काय घडलं?

पुणेः ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन २१ फेब्रुवारी या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार हे असणार आहे. तर सरहद पुणे यांच्या वतीने अखिल भारतीय मराठी साहित्य संमलनाचे आयोजन दिल्लीत करण्यात येणार आहे. याविषयीचा संवाद कार्यक्रम पार पडला. शरद पवार यांनी साहित्यांशी संवाद साधला. यावेळी देशाच्या राजधानीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावे, ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील साहित्यप्रेमींची इच्छा पूर्ण होणार आहे, या साहित्य संमेलनामुळे मराठी भाषेचा सुंगध देशाच्या कानाकोपऱ्यात दरवळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
उपस्थितांमधून शरद पवार यांना एक प्रश्न करण्यात आला की, हिंदीत बोलण्याचा आग्रह उपनगरांमध्ये केला जात आहे. मराठी भाषा टिकवायची असेल तर मराठी भाषा ही सक्तीची करावी, असा मुद्दा उपस्थित करताच पवारांनाही त्यावर मुश्किलपणे उत्तर दिले. या मुद्यावर पवार म्हणाले, तुमचा निरोप मी उद्धव ठाकरे यांना देतो, यावर उपस्थित असणाऱ्यांमध्ये एकच हशा पिकला तसेच संमेलनात यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वावर आणि इतिहासाचार्य राजवाडे यांच्या कार्यावर परिसंवादाचे आयोजन करावे, अशी मागणी होताच तुमचे म्हणणे साहित्य महामंडळापर्यंत पोहचवतो, असे पवार म्हणाले.
७० वर्षांनी संमेलन दिल्लीत
तब्बल ७० वर्षांनी दिल्लीत मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे. या संमेलनाचे आयोजन सहहद यां संस्थेद्वारे करण्यात आले आहे. जेष्ठ नेते शरद पवार हे या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपदी असणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
१९५४ साली दिल्लीत झाले होते संमेलन
३७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत १९५४ साली झाले होते. त्यावेळी उद्घाटक म्हणून तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू हे होते. तर स्वागताध्यक्षपदी काकासाहेब गाडगीळ हे होते. त्यानंतर जवळपास ७० वर्षांनी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे,





