“ठाकरे सरकारमधील मंत्री रोज सकाळी आपले विचार मांडत असतात मात्र”; प्रीतम मुंडेंकडून सरकारवर जहरी टीका
Updated On:

बीड : ओबीसी आरक्षणावरुन भाजपच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी आज माध्यमांशी सवांद साधला यावेळी मुंडे यांनी ठाकरे सरकार ओबीसी आरक्षण संपवण्याच्या मार्गावर आहे कि काय असा सवाल उपस्थित केला आहे.
त्या पुढे म्हणाल्या, ठाकरे सरकारमधील मंत्री रोज सकाळी आपले विचार मांडत असतात मात्र जनतेच्या प्रश्नांवर भाष्य करण्याऐवजी ते केवळ एका व्यक्तीवर बोलतात, हे दुर्दैवी आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी ठाकरे सरकारने तातडीने कारवाई करावी. अध्यादेश काढून आतापुरता दिलासा मिळाला आहे. पण येत्या काळातील निवडणुकांचे काय?, असा सवाल प्रीतम मुंडे यांनी केला आहे. असं म्हणत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.





