Omraje Nimbalkar post : “पक्ष बदलला असला तरी….”; हाती धनुष्यबाण घेतल्यानंतर ओमराजेंची पहिली पोस्ट
Omraje Nimbalkar post : आता शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश का केला याचं कारण सांगितलं आहे.

Omraje Nimbalkar post : गेल्या काही दिवसांपासून ज्या टायगर अॅापरेशनची चर्चा होती. अखेर या अॅापरेशमधील सहा खासदारांची मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेत शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत या सहा खासदारांचा अधिकृत पक्षप्रवेश झाला.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी तुफान फटकेबाजी करत सहा टायगर खऱ्या शिवसेनेत दाखल झाल्याचे विधान केले. या सहा खासदारांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिले ते म्हणजे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर. या पक्षप्रवेश सोहळ्यातील त्यांची देहबोलची विशेष चर्चा झाली. आता शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश का केला याचं कारण सांगितलं आहे.
“माझी खरी निष्ठा कोणत्याही पदाशी किंवा पक्षाशी नसून माझ्या मतदारसंघातील जनतेशी आहे. निवडणुकीत तुम्ही माझ्यावर दाखवलेला विश्वास हेच माझे सर्वात मोठे बळ आहे. आजचा निर्णयही त्याच विश्वासाला न्याय देण्यासाठी घेतला आहे. मला खात्री आहे की, या निर्णयामुळे आपल्या भागाच्या विकासाला अधिक गती मिळेल आणि आपण सर्व मिळून आपल्या जिल्ह्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर घेऊन जाऊ.” असं पक्ष प्रवेशाचे कारण ओमराजे यांनी सोशल मीडियावर पोस्टमध्ये सांगितलं आहे.
नेमकं काय म्हणाले ओमराजे निंबाळकर?
हिंदूहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारावर प्रेरित होऊन,शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली माझ्यासह परभणीचे तीन वेळा निवडून आलेले खासदार संजय (बंडू) जाधव, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे,ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील, यवतमाळ-वाशीमचे खासदार संजय देशमुख आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला.
यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम, गजानन कीर्तिकर, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक,मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री भरत गोगावले,माजी मंत्री डॉ तानाजीराव सावंत साहेब तसेच पक्षाचे अनेक मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा : Cycle Wari: देहू ते पंढरपूर सायकल वारीचा नवा रेकॉर्ड! विठ्ठलनामाच्या गजरात २३५० सायकलस्वारांनी रचला इतिहास
माझी खरी निष्ठा कोणत्याही पदाशी किंवा पक्षाशी नसून माझ्या मतदारसंघातील जनतेशी आहे. निवडणुकीत तुम्ही माझ्यावर दाखवलेला विश्वास हेच माझे सर्वात मोठे बळ आहे. आजचा निर्णयही त्याच विश्वासाला न्याय देण्यासाठी घेतला आहे. मला खात्री आहे की, या निर्णयामुळे आपल्या भागाच्या विकासाला अधिक गती मिळेल आणि आपण सर्व मिळून आपल्या जिल्ह्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर घेऊन जाऊ.
हिंदूहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारावर प्रेरित होऊन,शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली माझ्यासह परभणीचे तीन वेळा निवडून आलेले खासदार संजय (बंडू) जाधव, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे,ईशान्य… pic.twitter.com/85QvELkP3G
— Omprakash Rajenimbalkar (@OmRajenimbalkr) June 22, 2026
मी आजही तोच ओमराजे आहे, जो तुमच्या सुख-दुःखात उभा राहिला, तुमच्या प्रश्नांसाठी लढला आणि पुढेही लढत राहील. पक्ष बदलला असला तरी जनसेवेचे ध्येय, विकासाची तळमळ आणि तुमच्यावरील प्रेम यात कोणताही बदल होणार नाही.
तुमचा विश्वास, तुमचे प्रेम आणि तुमचा आशीर्वाद हेच माझी खरी ताकद आहे. विकास, प्रगती आणि जनसेवा या एकाच ध्येयाने मी पुढील वाटचाल करणार आहे.
एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य
या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी या खासदारांचा टायगर असा उल्लेख केला. याशिवाय त्यांनी आगमी काळात होणाऱ्या निवडणुकीत या खासादारांना तिकीट मिळणार आणि ते निवडून येणार असं मोठं वक्तव्य केलं. शिंदेंनी केलेलं हे वक्तव्य भुवया उंचावणारे आहे. त्यामुळे आता महायुतीत धुसफूस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा : PCMC News: स्मार्ट सिटी की खड्ड्यांची सिटी? पावसाच्या तोंडावर पिंपरी-चिंचवडकरांचा जीव टांगणीला; पाहा वास्तव





