Pahalgam Attack : चार दिवसांनंतरही बीएसएफ जवानाची सुटका नाही; पंजाब सीमेवरून पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले होते ताब्यात

Pahalgam Attack – पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेवरून अटक करण्यात आलेला बीएसएफ जवान पी.के. साहू अजूनही पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात आहे. घटनेला चार दिवस उलटून गेले आहेत आणि तीन ध्वज बैठका झाल्या आहेत, परंतु सैनिकाची सुटका होऊ शकली नाही.
यावर पाकिस्तानी रेंजर्स म्हणाले की, जोपर्यंत हायकमांडकडून सूचना मिळत नाहीत तोपर्यंत सैनिकाला सोडू शकत नाहीत. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी बीएसएफचे महासंचालक (डीजी) दलजित सिंग चौधरी यांनीही केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांच्याशी याबाबत चर्चा केली आणि उच्च पातळीवर हा मुद्दा उपस्थित केला आहे.
पत्नीचा आकांत सुरू
सैनिकाची पत्नी रजनी म्हणाली, मी माझ्या पतीला परत आणण्यासाठी फिरोजपूरला जाईन. माझे तिकीट अद्याप कन्फर्म झालेले नाही. मी तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलेन आणि त्यांना माझ्या पतीला परत आणण्यास मदत करण्यास सांगेन. जर मला इथे कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, तर मी दिल्लीला जाऊन अधिकाऱ्यांना भेटेन.





