IND vs ENG : अखेर अब्रूची होळी झालीच! पाचव्या टी-२० मध्ये इंग्लंडने भारताचा धुव्वा उडवत ४-० ने मालिका घातली खिशात
IND vs ENG : या विजयासह इंग्लंडने ही मालिका ४-० अशी एकतर्फी आपल्या नावावर केली. यासह भारतीय संघाची टी-२० क्रमवारीतील एक नंबरची खुर्ची पण गेली.

IND vs ENG 5th T20I Southampton Match Result Series 4-0 Shreyas Iyer Gautam Gambhir : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यातही इंग्लंडने भारताचा ५६ धावांनी पराभव केला. या विजयासह इंग्लंडने ही मालिका ४-० अशी एकतर्फी आपल्या नावावर केली. इंग्लंडने दिलेल्या २५८ धावांच्या हिमालयासारख्या लक्षाचा पाठलाग करताना भारतीय संघ २० षटकांत ८ बाद २०१ धावांपर्यंतच मजल मारू शकला. या मानहानिकारक पराभवानंतर विश्वविजेत्या सूर्यकुमार यादवच्या जागी कर्णधार बनलेला श्रेयस अय्यर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आता टीकाकारांच्या थेट निशाण्यावर आले आहेत.
बटलरचे वादळ अन् ब्रुकचा तडाखा; २५७ धावांचा डोंगर –
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने ३ बाद २५७ धावांचा ऐतिहासिक डोंगर उभारला. सलामीवीर जॉस बटलरने अवघ्या ६४ चेंडूंत १२ चौकार आणि ८ षटकारांसह १३१ धावांची तूफानी शतकी खेळी केली. त्याला कर्णधार हॅरी ब्रुकने दमदार साथ देत ४५ चेंडूंत नाबाद ९५ धावा ठोकल्या. दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी २३३ धावांची जागतिक विक्रमी भागीदारी झाली. भारताकडून शिवम दुबेने २ बळी घेतले, तर अक्षर पटेलने ६३ आणि प्रिन्स यादवने ६० धावा खर्च केल्या.
England win the fifth and final T20I by 56 runs to take the series 4-0.
Scorecard ▶️ https://t.co/7mo5osv0MW#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/iy1b88cP4V
— BCCI (@BCCI) July 11, 2026
संजू -इशान आणि तिलकची झुंज व्यर्थ –
Shreyas Iyer as T20I Captain:
❌ First time India lost against Ireland
❌ First Series lost against Ireland
❌ First time India been winless for 7+ Matches
❌ First Series loss against ENG since 2021
❌ Back-to-Back series loss for IND after 7 Years
❌ Lost T20I series against… pic.twitter.com/vaB0xkqRoW— CricketGully (@thecricketgully) July 11, 2026
२५८ धावांच्या कठीण आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली, पण ठराविक अंतराने विकेट्स पडल्याने भारताचा डाव घसरला. इशान किशनने ३५ चेंडूंत ५६ धावांची अर्धशतकी खेळी केली, तर तिलक वर्माने २५ चेंडूंत ५३ धावा कुटल्या. संजू सॅमसनने १४ चेंडूंत २७ तर कर्णधार श्रेयस अय्यरने २८ धावा केल्या. मात्र, इतर फलंदाजांनी नांगी टाकल्यामुळे भारताचे आव्हान २०१ धावांवर संपुष्टात आले.
सॅम करनची भेदक गोलंदाजी –
Shreyas Iyer’s Last 14 Matches as T20 captain:
❌ Lost by 6 Wickets vs RR
❌ Lost by 4 Wickets vs GT
❌ Lost by 33 Runs vs SRH
❌ Lost by 3 Wickets vs DC
❌ Lost by 6 Wickets vs MI
❌ Lost by 23 Runs vs RCB
✅ Won by 7 Wickets vs LSG
❌ Lost by 34 Runs vs IRE
❌ Lost by 1 Run… pic.twitter.com/lqRaTlOwRA— CricketGully (@thecricketgully) July 11, 2026
इंग्लंडच्या वतीने ऑलराउंडर सॅम करनने घातक गोलंदाजी करत ४ षटकात ३६ धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या आणि भारताचे कंबरडे मोडले. आदिल रशीदने २ विकेट्स घेत त्याला उत्तम साथ दिली. आयर्लंड पाठोपाठ इंग्लंडविरुद्धही मालिका गमावल्यामुळे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.





