Vijay Thalapathy – आगामी विधानसभा निवडणुका इतरांसाठी सामान्य निवडणूक असू शकतात, परंतु माझ्यासाठी आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी हा भावनांचा समुद्र आहे. तामिळनाडूच्या मतदारांनी आगामी निवडणुकीत आम्हाला संधी द्यावी, असे भावनिक आवाहन तामिळनाडू वेत्री कळघम (टीव्हीके) चे प्रमुख अभिनेता-राजकारणी विजय थलापथी यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकांबाबत तामिळनाडूमध्ये राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. सर्व राजकीय पक्ष त्यांच्या तयारी करण्यात व्यस्त आहेत. विजय तंजावरमध्ये त्यांच्या पक्षाच्या अधिकाऱ्यांना संबोधित करत होते. विजय यांनी आपल्या भाषणात सांगितले की, माझ्या पक्षाचे निवडणूक चिन्ह शिट्टी आहे. पक्षाचा दणदणीत विजय सुनिश्चित करण्यासाठी ही शिट्टी तामिळनाडूतील प्रत्येक घरात आणि प्रत्येक मतदान केंद्रात घुमली पाहिजे. सत्ताधारी द्रमुक ही तिया शक्ती (दुष्ट शक्ती) आहे. राज्यातील मुलेही आता द्रमुकला या नावाने हाक मारू लागली आहेत, असा दावाही विजय यांनी केला. विजय राजकारणात का आले? विजय यांचा चाहतावर्ग दक्षिण भारतात अत्यंत मोठा आहे. त्यांच्या चाहतामंडळांनी (fan clubs) अनेक वर्षे सामाजिक कामे केली. त्याच नेटवर्कला राजकीय संघटनेत रूपांतरित करून त्यांनी लोकांशी थेट संपर्क साधण्याचा निर्णय घेतला. पक्षाची स्थापना फेब्रुवारी 2024 मध्ये झाली असून सामाजिक न्याय, पारदर्शक प्रशासन आणि युवक-केंद्रित राजकारण आणि तमिळनाडू राज्यातील राजकीय पर्याय निर्माण करणे हा पक्षाचा मुख्य उद्देश आहे. पक्षाची प्रमुख विचारधारा : भ्रष्टाचारमुक्त प्रशासन शिक्षण आणि रोजगारावर भर सामाजिक समानता आणि कल्याणकारी योजना युवक आणि महिलांचा राजकारणातील सहभाग प्रादेशिक अभिमान व विकास