Election Commission of India। भारतीय निवडणूक आयोगाने देशातील आगामी निवडणुकीतील मतमोजणी प्रक्रियेसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने आता पोस्टल मतपत्रिका मोजण्याचे नियम बदलले आहेत. ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मोजणीचा दुसरा अंतिम टप्पा आता पोस्टल मतपत्रिका मोजणी पूर्ण झाल्यानंतरच सुरू होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात येत आहे. आयोगाच्या निर्णया अगोदर पोस्टल मतपत्रिका मोजणीपूर्वी ईव्हीएम मोजणी संपवू शकत होती. पारदर्शकता आणि स्पष्टता सुनिश्चित करण्यासाठी हा बदल करण्यात आला होता.मतदानाच्या दिवशी, पोस्टल मतपत्रिका मोजणी सकाळी ८:०० वाजता सुरू होते आणि ईव्हीएम मोजणी सकाळी ८:३० वाजता सुरू होते. Election Commission of India। पूर्वी, पोस्टल मतपत्रिका मोजणीच्या कोणत्याही टप्प्यावर ईव्हीएम मोजणी सुरू ठेवता येत होती आणि पोस्टल मतपत्रिका मोजणीपूर्वी ती पूर्ण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, आयोगाने आता निर्णय घेतला आहे की पोस्टल मतपत्रिका मोजणी पूर्ण झाल्यानंतरच ईव्हीएम/व्हीव्हीपीएटी मोजणीचा दुसरा अंतिम टप्पा सुरू होणार आहे. ‘एकरूपता आणि स्पष्टता…’ Election Commission of India। मतमोजणी प्रक्रियेत एकरूपता आणि अत्यंत स्पष्टता आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे असे आयोगाने म्हटले आहे. हे विशेषतः ज्या मतमोजणी केंद्रांवर पोस्टल मतपत्रिका मोजल्या जातात त्यांना लागू होईल. या बदलामुळे सर्व मते अचूकपणे आणि कोणत्याही गोंधळाशिवाय मोजली जातील याची खात्री होईल.