Eknath Shinde : महायुती सरकार संकटातील बळीराजाच्या पाठीशी : एकनाथ शिंदे
Eknath Shinde : संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने मोठा खंड दिल्याने खरीप पिके करपण्याच्या अवस्थेत आली असून शेतकरी संकटात सापडला आहे.

Eknath Shinde : संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने ताण दिला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पिके करपण्याच्या अवस्थेत आहेत. या परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा बिकट परिस्थितीत शेतक-यांना वा-यावर न सोडता महायुती सरकार खंबीरपणे शेतक-यांच्या पाठीशी उभा असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. (Eknath Shinde)
परभणी शहरातील इंदिरा गांधी स्टेडीयम मैदानावर रविवारी शेतकरी व युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे मेळाव्यास उपस्थित शेतकरी व युवकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री आशिष जैस्वाल, खासदार संजय जाधव उपस्थित होते. (Eknath Shinde)

एकनाथ शिंदे म्हणाले, आजच्या शेतकरी व युवा संवाद मेळाव्याला असलेली गर्दी जमवलेली किंवा भाड्याची नसून मनापासून उपस्थित असलेल्या लाडक्या बहिणी, भाऊ व शेतक-यांची गर्दी आहे. महायुती सरकारने प्रत्येकाच्या नावापुढे आईचे नाव लिहीण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. (Eknath Shinde)
केंद्राप्रमाणे राज्याने शेतक-यांना ६ हजार देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कर्जमाफी योजनेचा १२ शेतक-यांना लाभ मिळाला आहे. शेतकरी व युवकांच्या हिताच्या योजना प्राधान्याने सुरू राहतील. महायुती सरकार सदैव शेतक-यांच्या हिताचा निर्णय घेणारे असल्याचे त्यांनी सांगितले. (Eknath Shinde)





