बारामती (डोर्लेवाडी) – करोनाच्या काळात अक्षरशः शिक्षकांना पाच महिने बसून पगार दिलाय. तरी अजून पगार 5 तारखेला करा, अशी मागणी शिक्षकांकडून केली जात आहे. शिक्षकांनो जरा शेतकऱ्यांचा विचार करा, जगात काय चाललंय देशात काय चाललंय हे बघा अशा शेलक्या शब्दात शिक्षकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनावलं. ते बारामतीत एका उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.