Chandrahar Patil : शिवराज राक्षेवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलाने तडकाफडकी घेतला ‘हा’ निर्णय

सांगली : नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील पंचांच्या निर्णय वादावरून मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. यादरम्यान डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलाने एक तडकाफडकी निर्णय घेतला आहे. चंद्रहार पाटलांनी आपली महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पंचांचे चुकीच्या निर्णयामुळे आपल्याला ट्रिपल महाराष्ट्र केसरी होताना पराभवाला समोर जावं लागलं होतं असे म्हणत त्यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे.
शिवराज राक्षेसाठी मैदानात
शिवराज वाक्षेच्या पंचांच्या लाथ मारण्याच्या घटनेवरून पंचाला गोळ्या घातल्या पाहिजे होत्या. असं वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर आता चंद्रहार पाटील यांनी शिवराज राक्षेसाठी दंड थोपटले आहेत.
माझ्या मानाच्या समाधानासाठी कबुली द्या – चंद्रहार पाटील
सांगली जिल्ह्याला मी 28 वर्षानंतर महाराष्ट्र केसरी मिळवून दिली. 35 वर्षानंतर मी डबल महाराष्ट्र केसरी झालो. तोपर्यंत कुणीही डबल महाराष्ट्र केसरी नव्हतं. ट्रिपल महाराष्ट्र केसरीसाठी उतरणारा पहिला पैलवान मी होतो. इतिहासात असं कधीच झालं नव्हतं. पण आज जसा शिवराज राक्षेवर अन्याय झाला, तसंच मला देखील ट्रिपल महाराष्ट्र केसरी होत असताना मला हरवण्यात आलं होतं.
काका साहेब पवारांनी कबुली दिली आहे की, चंद्रहार पाटलांवर अन्याय झाला होता. संदीप बोंडवे यांनी देखील माझ्यावर अन्याय झाल्याची कबुली दिली होती. माझ्या मानाचं समाधान होईल, यासाठी सर्वांनी कबुली दिली असे पैलवान चंद्रहार पाटील म्हणाले आहेत. माझ्या मनाला मोठा आघात झाला होता. मी त्यावेळी आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होतो. पण सहकाऱ्यांच्या मदतीने मी मागे निघालो.
गदा परत करणार
आज शिवराज राक्षेवर अन्याय झाला आहे. पाच सेकंदाच्या चुकीच्या निर्णयामुळे शिवराज राक्षेचं नुकसान झालं आहे. जर दोन दिवसाच्या आत सर्वांनी कबुली दिली नाही तर मी दोन्ही जिंकलेली गदा परत देणार असल्याचे चंद्रहार पाटील यांनी जाहीर केले आहे.
पृथ्वीराजची चूक नाही – चंद्रहार पाटील
कुस्तीनंतर शिवराज राक्षेने रागाच्या भरात पंचांना लाथ घातली ही चूक झाली. पण जो कालच्या सामन्यात पंच होता, असल्या पंचांना गोळ्या घातल्या पाहिजेत, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली चंद्रहार पाटलांनी शिवराज राक्षेच्या पराभवानंतर दिली होती. पृथ्वीराजची काही चूक नाही. मात्र पंचाचा निर्णय वादग्रस्त आहे, असं चंद्रहार पाटलांनी सामन्यानंतर म्हटलं होतं.





