DK Shivakumar Statement : “आमच्यावर अन्याय झाला…”; RCB चॅम्पियन होताच मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार भडकले; आयोजकांवर केले आरोप
DK Shivakumar Statement : कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांचे एक मोठे आणि वादग्रस्त विधान समोर आले आहे.

DK Shivakumar Statement on RCB IPL 2026 Final Venue : आयपीएल २०२६ च्या महाअंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरात टायटन्सचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा ट्रॉफीवर आपले नाव कोरले. संपूर्ण देशभरातील आरसीबीचे फॅन्स या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष साजरा करत असतानाच, कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांचे एक मोठे आणि वादग्रस्त विधान समोर आले आहे. आरसीबीच्या या जेतेपदावर त्यांनी आनंद व्यक्त केला असला, तरी फायनल सामन्याचे ठिकाण (वेन्यू) गुजरातला हलवल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी जाहीर केली आहे.
“राजकारणामुळे फायनल मॅच गुजरातला नेली!”
पत्रकारांशी बोलताना डी. के. शिवकुमार यांनी थेट आयोजकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, “आयपीएल २०२६ चा फायनल सामना हा बंगळुरुमध्येच खेळवला जायला हवा होता. आमच्यावर आणि कर्नाटकवर हा घोर अन्याय झाला आहे. निव्वळ राजकारणामुळे या सामन्याचे ठिकाण बदलून तो दुसऱ्या राज्यात (गुजरात) शिफ्ट करण्यात आला. या विषयावर मी आता यापेक्षा जास्त काही बोलणार नाही.”
Tonight, Bengaluru rises again as champions!
ಈ ಸಲವೂ ಕಪ್ ನಮ್ದೇ ⭐️⭐️
RCB has created history by clinching a second consecutive IPL title. With grit, composure, and the heart of true champions, the team has once again made Bengaluru proud.
Congratulations to the players,… pic.twitter.com/y2hgXT4m2l
— DK Shivakumar (@DKShivakumar) May 31, 2026
ते पुढे म्हणाले, “जर हा महामुकाबला बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झाला असता, तर कर्नाटकच्या चाहत्यांसाठी तो अत्यंत अभिमानाचा आणि संस्मरणीय क्षण ठरला असता. आपल्या घरच्या संघाला घरच्या मैदानावर सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनताना पाहणे चाहत्यांसाठी खूप रोमांचक राहिले असते. तरीही, सर्व आरसीबी फॅन्स आणि कर्नाटक सरकारच्या वतीने मी संघाचे मनापासून अभिनंदन करतो.” मैदानाबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरही (ट्विटर) पोस्ट शेअर करत आरसीबीचे कौतुक केले.
आरसीबीची ‘एलिट क्लब’मध्ये एन्ट्री; मुंबई-चेन्नईच्या विक्रमाशी बरोबरी!
𝗧𝗵𝗲 𝗺𝗼𝗺𝗲𝗻𝘁. 𝗧𝗵𝗲 𝗴𝗹𝗼𝗿𝘆. 𝗧𝗵𝗲 𝗖𝗵𝗮𝗺𝗽𝗶𝗼𝗻𝘀! 🏆#TATAIPL | #Final | #TheFinalLeap | #RCBvGT pic.twitter.com/d39Y1gW5DI
— IndianPremierLeague (@IPL) May 31, 2026
अहमदाबाद येथे झालेल्या या खिताबी सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सचा ५ विकेट्सने पराभव केला. या विजेतेपदासह आरसीबीने सीएसके आणि मुंबई इंडियन्सच्या (एका खास ‘एलिट क्लब’मध्ये प्रवेश केला आहे. आयपीएलच्या इतिहासात सलग दोनदा ट्रॉफी जिंकणारा आरसीबी हा आता तिसरा संघ बनला आहे. आरसीबीने २०२५ आणि २०२६ चे विजेतेपद पटकावले आहे, तर यापूर्वी चेन्नईने (२०१०, २०११) आणि मुंबईने (२०१९, २०२०) हा पराक्रम केला होता. सर्वाधिक आयपीएल खिताब जिंकण्याच्या यादीत मुंबई आणि चेन्नई ५-५ खिताबांसह पहिल्या, कोलकाता नाईट रायडर्स ३ खिताबांसह दुसऱ्या तर आरसीबी २ खिताबांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.





