“धनंजय मुंडेंना सहआरोपी करा” ; मुंडेंच्या राजीनाम्यानंतर विरोधक आक्रमक, सरकार बरखास्तीचीही मागणी

Dhananjay Munde Resignation । बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडेचे निकटवर्तीय वाल्मिक कराडचे नाव समोर आले आहे. देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर आता मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांच्या राजीनाम्यानंतर आता विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. धनंजय मुंडेंना सरपंच हत्या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आज अखेर राजीनामा दिला आहे .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला आहे. गेल्या दोन अडीच महिन्यांपासून संतोष देशमुख हत्येवरून महाराष्ट्राचं राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. सीआयडीच्या तपासात दोषारोपात सादर झालेले पुरावे व्हायरल झाल्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रियासमोर आल्या आहेत. वाल्मीक कराडला फासावर लटकवण्याची मागणीदेखील विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसेच धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्याची अनेक नेत्यांनी मागणी केली आहे.
त्याला माणूस म्हणूस कसं काय म्हणू – जितेंद्र आव्हाड
संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी, “जातीचा वापर करून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते .तशा प्रयत्नांमध्ये कोणीही यशस्वी होऊ शकत नाही . घटनाक्रम बघा नागपूर अधिवेशनापूर्वी ही हत्या झाली. त्याचं वर्णन मी अधिवेशनात सांगितली. सरकारकडे इंतभूत माहिती असताना राजिनामा का नाही घेतला? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला. सर्व फोटो सर्व माहिती होती.म्हणून मी दगड आणला, कारण सरकारला पाझर फुटुत नव्हता. ज्या जातीचा धनजय मुडे आहे त्याच जातीचा मी आहे. अशी क्रूरता ज्यात आहे त्याला माणूस म्हणूस कसं काय म्हणू शकतो. हे सर्व झालं जी अवादा कंपनी खंडणी वसूल तसेच वाल्मिक आणि धनंजय मुडे यांचे संबघ आहेत.” असे त्यांनी म्हटले आहे.
आदित्य ठाकरेंकडून तीन प्रमुख मागण्या Dhananjay Munde Resignation ।
या प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. याविषयी बोलताना त्यांनी, “धनंजय मुंडे गाडीतून बसून उपमुख्यमंत्र्यांच्या घरी गेले. त्यांच्यात एक बैठक झाली. मुख्यमंत्री त्यांना बोलवून घेऊ शकत नाहीत?मुख्यमंत्र्यांना कळत नाही? गेल्या काही दिवसांपासून इतकं घाणेरडे राजकारण सुरू आहे. कधी सरपंचाला सांगतात फंड नाही देणार. तुम्हाला अधिकारात नाही देणारतुम्हाला फंड नाही देणार .एका सरपंचाला तुम्ही न्याय देऊ शकत नाही .हे सरकार बरखास्त केले पाहिजे .अशी आक्रमक प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली. सुधारित चार्जशीट दाखल करा, धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, सरकार बरखास्त करा, “आदित्य ठाकरेंनी या तीन मोठ्या मागण्या केल्या.
धनंजय मुंडेंना सहआरोपी करा – संदीप क्षीरसागर Dhananjay Munde Resignation ।
दरम्यान , या सगळ्या प्रकरणाला लावून धरणारे आमदार संदीप क्षिरसागर यांनी,”हे फोटो व्हायरल झाल्यानंतर आमच्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती गंभीर आहे . लोकांनी जेव्हा हे फोटो सोशल मीडिया वरती बघितले मीडियावरती बघितले आज पूर्ण जिल्हा आमचा बंद आहे . लोकांच्या भावना लोकांच्या भावना ह्या तीव्र झालेला आहे . खंडणी प्रकरणात जर सातपुड्यावर मीटिंग झाली असेल हे सुरेश धस जे बोलले आहेत .ते पुरावे असल्याशिवाय बोलणार नाहीत .तसं असेल तर त्यांना सह आरोपी करायला हवं . ज्या पद्धतीने या कुटुंबावरती अन्याय सर्वच सभागृहांमध्ये या विषयावरती बोलले सरकारने सुद्धा त्याची दखल घेतली आणि जेव्हा पोलीस प्रशासन मधले यशस्वी ची बदल झाली सीआयडी ची चौकशी लागली चौकशी लागल्यानंतर जे काही कालपर्यंत तपासा आम्ही बघितलं आमच्या सर्वांचा आमदारांची त्याच्यावरती लक्ष आहे तर मुख्य आरोपी म्हणून वाल्मीक करायला घेतलेला आहे . वाल्मीक कराडला फाशी दिली पाहिजे” अशी मागणी केली आहे.





