Air Pollution : दिल्ली शहर प्रदुषणाच्या विळख्यात… कारणं काय ? हवेची गुणवत्ता ढासळणे म्हणजे नेमकं काय असतं ?

देशातील वायू प्रदुषण हा चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये तर वायू प्रदुषणाचा विळख्यात काही शहरे सापलेली आहेत. त्यातलच एक शहर म्हणजे दिल्ली. आजमितीला दिल्ली वायू प्रदुषणाच्या विळख्यात सापडलेली आहे. मोठ्या प्रमाणावर वायू प्रदुषण या शहरात होत आहे. याचा परिणाम तिथल्या रहिवाशांना सोसावा लागत आहे. पण इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रदुषण होणे याला जबाबदार प्रशासन आणि नागरिक असल्याचे दिसते. वाढत्या प्रदुषणाच्या समस्येमुळे प्राणी आणि निसर्गावर याचा विघातक परिणाम दिसून येत आहे. तेथील नागरिकांना देखील प्रदुषणामुले कमी दृश्यमानता, श्वास घेण्यास त्रास होणे, मोठ्या संख्येने श्वसनाचा आजार, पृष्ठभागावरील पाण्याची गुणवत्ता आणि शहरातील कामांमध्ये व्यत्यय येवू लागला आहे. वायू प्रदुषण रोखण्यासाठी शासन स्थरावर अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र, बऱ्याच ठिकाणी शासनाने घालून दिलेल्या नियमांची पालमल्ली होताना दिसत आहे.
दिल्ली हे शहर भारतातील सर्वात दाट लोकवस्तीचा प्रदेश म्हणून ओळखले जाते. अत्यंत दाटीवाटीचा प्रदेश म्हटले तरी वावगे वाटू नये, अशी येथली परिस्थिती आहे. शहरात अनेक उपक्रम राबविताना पर्यावरणीयदृष्ट्या चुकीच्या पद्धतीने केले जात आहेत. यामुळे धूळ तयार होऊन ती हवेत मिसळती परिणामी हवा प्रदूषित होते. सगळ्यात कहर म्हणजे दिवाळी उत्सवादरम्यान आठवडाभर सतत फटाके फोडले जातात. यामुळे हिवाळ्याच्या हंगामात विषारी धूर निघतो. या काळात, प्रदूषित हवा वातावरणाच्या खालच्या थरांमध्ये अडकून पडल्याने हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) लक्षणीयरीत्या वाढतो.
या कारणामुळे हवेचा निर्देशांक वाढला
दिल्लीसह उत्तर भारतात थंडी आणि दाट धुक्यामुळे हवेची गुणवत्ता ढासळली आहे. यामुळे हवेचा निर्देशांक वाढला आहे. धूर, धुळीचे कण, वाहनांच्या धुरातून बाहेर पडणारे लहान कण साचून राहतात. परिणामी शहरांवर प्रदूषित हवा जास्त काळ टिकून राहते. त्यामुळे उत्तर भारतातील शहरांचा हवा गुणवत्ता निर्देशांक बिघडला असल्याचे दिसत आहे.
हवेची गुणवत्ता निर्देशांक म्हणजे काय ?
हवेची गुणवत्ता म्हणजे हवेतील विविध प्रदूषकांची पातळी
गंधक डायऑक्साईड (SO₂)
नायट्रोजन ऑक्साईड (NO₂)
कार्बन मोनॉक्साईड (CO)
पॅर्टिक्युलेट मॅटर (PM2.5 आणि PM10)
जेव्हा या घटकांची पातळी ठराविक मर्यादेपेक्षा जास्त होते. त्यावेळी हवेची गुणवत्ता खराब होते. परिणामी आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.
हवेची गुणवत्ता निर्देशांक (AQI)
AQI हवेच्या गुणवत्तेचे मापन करण्यासाठी वापरले जाते. हवेतील विविध प्रदूषकांच्या पातळीचा विचार केला जातो. AQI हे सहा रंगांच्या कोडच्या श्रेणींमध्ये विभागलेला आहे, ते खालीलप्रमाणे
0-50 (चांगली): स्वच्छ हवेचा अनुभव.
51-100 (समाधानकारक): आरोग्याच्या बाबतीत फारसा धोका नाही.
101-200 (मध्यम): संवेदनशील लोकांसाठी थोडासा धोका.
201-300 (खराब): आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
301-400 (खूप खराब): गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
401-500 (गंभीर): संपूर्ण आरोग्यासाठी धोका
उत्तर भारतातील शहरे प्रदूषित
जगातील पहिल्या दहा सर्वांधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातील आठ शहरांचा समावेश आहे. दिल्ली पाठोपाठ उत्तर भारतातील अनेक शहरांतील हवेची गुणवत्ता वाईट किंवा अति धोकादायक पातळीवरच्या उबंरठ्यावर आली आहे. हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार प्रदूषित नवी दिल्ली – ४३८, हापूर (उत्तर प्रदेश) – ४३०, भिवानी (हरियाणा) ४०४, दकिंग (चीन) ३९८, गुरुग्राम (हरियाणा) ३८३, गझियाबाद (उत्तर प्रदेश) – ३६५, सोनीपत (हरियाणा) ३५१, मेरठ (उत्तर प्रदेश) ३५१, अद दिरियाह (सौदी अरेबिया) ३४४, नोएडा (उत्तर प्रदेश) ३४१( या आकडेवारीत बदल होऊ शकते
प्रदूषणामुळे रोगराईत वाढ
पूर्वीच्या काळी हिवाळा आरोग्यसाठी चांगला मानला जात होता. अलीकडच्या काळात हिवाळ्यात प्रदुषण वाढत चाललेले आहे. दमा, ब्राँकायटिस, टीबी, हृदयरोग आणि मानसिक आजार प्रदुषणामुळे वाढत आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने प्रदूषणमुक्तीसाठी ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे. प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी वृक्षसंख्येत वाढ करणे, शहरात सायकलचा उपयोग वाढविणे, वाहनांच्या संख्येत घट करणे, कचरा न जाळणे, उद्योगांनी प्रदूषण रोखणे आवश्यक आहे. यासोबतच नागरिकांनीसुद्धा प्रदूषण होऊ नये अशा उपाययोजना कराव्या असे सांगण्यात आले आहे.
भयावह परिस्थिती
महाराष्ट्रातील 22 शहरेही प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असल्याचे दिसत आहे. दिल्ली, मेरठ, फरिदाबाद, नोएडा, गाझियाबाद या शहरातील परिस्थिती गंभीर बनली आहे. वाढतं प्रदूषण हे फक्त दिल्ली किंवा अन्य शहरांमध्ये नाही, तर मुंबईसारख्या देशाच्या अर्थिक राजधानीतही अनेकदा हवेची गुणवत्ता खाल्यावल्याचं दिसून येते. तर देशातील अतिप्रदुषित असलेल्या शहरांमध्ये दिल्ली, मुंबई, लखनौ,विशाखापट्टणम, मीरत व रोहतक, चैन्नई, कोलकत्ता, पाटणा, नागपूर व दुर्गापूर या शहरांचा समावेश होतो.





