पश्चिम बंगालमध्ये “रेमल’ चक्रीवादळाचं थैमान: 29500 घरांचे नुकसान, झाडे उन्मळली, विजेचे खांब कोसळले…4 जणांचा मृत्यू

कोलकाता – रेमल चक्रीवादळाने पश्चिम बंगालमध्ये थैमान घातले आहे. ताशी 135 किमी वेगाने वाऱ्यासह, रेमल हे चक्री वादळ बांगलादेश आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकले. यावेळी मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे घरे आणि शेतात पाणी भरलं. चक्रीवादळ रेमलने जवळपास 29500 घरांचे नुकसान झाले असून 4 जणांचा मृत्यू झाला आहे.
पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या लगतच्या किनारपट्टीवर सागर बेट आणि शेजारच्या मोंगलाच्या नैऋत्येकडील खेपुपारा दरम्यान रविवारी रात्री 8.30 च्या दरम्यान जमीन धसण्यास सुरूवात झाली. लँडफॉल झाल्यापासून कोलकात्यासह पश्चिम बंगालच्या अनेक भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे.
विध्वंसाची शक्यता लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन पथके मदत आणि बचावकार्यासाठी तैनात आहेत.चक्रीवादळ रेमलने घरे उद्ध्वस्त केली, झाडे उन्मळून पडली आणि विजेचे खांब कोसळले आहेत. सुंदरबनमधील गोसाबा परिसरात ढिगाऱ्याखाली येऊन एक जण जखमी झाला आहे.
पश्चिम बंगाल सरकारने रविवारी दुपारपर्यंत किनारपट्टी आणि संवेदनशील भागातून सुमारे 1.10 लाख लोकांना बाहेर काढले आणि त्यांना चक्रीवादळ आश्रयस्थानांमध्ये हलवले. लोकांना प्रामुख्याने दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातून, विशेषतः सागर बेट, सुंदरबन आणि काकडद्वीपमधून हलवण्यात आले.
हवामान कार्यालयाने सांगितले की, तीव्र चक्रीवादळ रेमल रविवारी रात्री ताशी 135 किमी वेगाने पश्चिम बंगालमधील सागर बेट आणि बांगलादेशातील खेपुपारा दरम्यान जमिनीवर धडकले. या वेळी दिघा या किनारपट्टीच्या रिसॉर्ट शहरात समुद्राच्या भिंतीवर प्रचंड भरतीच्या लाटा आदळल्या होत्या.





