मुंबई- राज्यात कोरोनाची लागण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात पाच हजार चाचणी होईल एवढी राज्यात क्षमता आहे. रॅपीड टेस्टला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे कोरोनाचे निदान आता पाच मिनिटात होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
लड घेतल्यावर पाच मिनिटात आपल्या शरीरात अॅन्टीबॉडीज तयार झालेले आहेत का त्याच्या प्रमाणावरुन संबंधित व्यक्तीला इन्फेक्शन आहे का ते समजणार आहे. ते निदान शिघ्र गतीने झालं तर परिस्थिती आटोक्यात आणायला मदत होईल शिवाय त्या संबंधित व्यक्तीला क्वारंटाईन केल्या जाईल, असंही ते म्हणाले.
दरम्यान, ‘कोरोना ही युद्धापेक्षाही मोठी समस्या आहे. सर्वांनी टीमवर्कने एकत्र येऊन सामोरं जायला पाहिजे,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.