मुंबई – हिंदू देवस्थानांच्या जमिनींची लूट राज्यात सुरू आहे. देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचे षडयंत्र गेल्या काही वर्षांपासून सुरु असल्याचा आरोप माजी मंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत केला.
अशा जमिनींबाबत झालेल्या घोटाळ्यांची माहिती त्यांनी सभागृहात सादर केली. या सगळ्यामागे अधिकारी कोण आहेत, राजकीय नेते कोण आहेत, याचा लाभ कोणाला झाला, याचा खुलासा व्हावा अशी मागणी त्यांनी केली.
एका महिन्याच्या आत विशेष अधिकारी नेमून दूध का दूध पानी का पानी करावे आणि जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
“…त्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही”, शेतकरी प्रश्नावरून अजित पवार आक्रमक
जयंत पाटील यांनी विधानसभेत गायरान जमिनीचा मुद्दा देखील मांडला. ते म्हणाले की, गायरान जमिनींची स्थितीही फारशी वेगळी नाही. एकीकडे गावातील लोक गायरान जमिनी विकत आहेत तर दुसरीकडे ज्यांना राहायला जागा नाही असे गोरगरीब नाईलाजाने या जमिनींवर अतिक्रमण करून तिथे राहात आहेत. त्यांच्या राहण्याच्या प्रश्नाचीही दखल घ्यावी.