“१२ वेळा ट्रम्प भारत-पाक युद्धबंदीवर बोलले पण पंतप्रधान गप्प का?” ; ‘सरेंडर’वरून काँग्रेसची सरकारवर टीका

Congress targets BJP । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवल्याचा दावा केल्यानंतर भारतीय राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर तीव्र हल्ला चढवला आहे. त्यांच्या “कृतीवर” प्रश्न उपस्थित केले आहेत.
काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर टीका करताना, “गेल्या ११ वर्षांपासून भाजप ‘मुकद्दर का सिकंदर’ हा चित्रपट बनवत होती, पण जेव्हा चित्रपट तयार झाला तेव्हा त्याचे नाव ‘नरेंद्र का सरेंडर’ असे समोर आले.” असे म्हटले आहे. पुढे बोलताना त्यांनी,”शौर्य हे कोणत्याही इंजेक्शनने येत नाही, ते चारित्र्याने येते आणि भाजप-आरएसएसचा इतिहास भ्याडपणाचा आहे.” असे म्हणत त्यांनी सडकून टीका केली.
ट्रम्प यांच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित Congress targets BJP ।
पवन खेडा यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावरही निशाणा साधला. ज्यामध्ये त्यांनी १२ वेळा दावा केला होता की भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध त्यांच्यामुळेच थांबली. तसेच खेडा म्हणाले, “ट्रम्पचा फोन आला आणि नरेंद्र मोदींनी लाजून आत्मसमर्पण केले. २२ दिवसांत ट्रम्प यांनी डझनभर वेळा युद्धबंदी पूर्ण केल्याचे म्हटले आहे, परंतु पंतप्रधान एकदाही उत्तर देऊ शकले नाहीत. नाव नरेंद्र आणि काम समर्पण याचं हे वास्तव आहे.”
चीनलाही लक्ष्य करण्यात आले: “धोरण भीतीने बनवले जात नाही”
काँग्रेस प्रवक्त्यांनी चीनच्या मुद्द्यावरही पंतप्रधान मोदींना घेरले. ते म्हणाले की, पंतप्रधान चीनसमोरही घाबरतात. जर तुम्ही खरोखरच धाडसी असाल तर चीनचा सामना करण्यासाठी धोरण बनवा, फक्त संवादाने काहीही साध्य होणार नाही. त्यांनी उपहासाने म्हटले की, मोदीजींनी संवाद सादरीकरणाचे प्रशिक्षण परेश रावल यांच्याकडून घेतले होते, ज्यांना त्यांनी एकेकाळी खासदार बनवले होते.
‘पराजय शंकर’ आणि सरकारचे मौन Congress targets BJP ।
एस जयशंकर यांच्याबद्दल, खेडा म्हणाले की, ते आता “पराजय शंकर” झाले आहेत.” ते म्हणाले की जयशंकर गप्प आहेत कारण जेव्हा जेव्हा ते बोलतात तेव्हा त्यांना ट्रोल केले जाते. बांगलादेश सीमेजवळ चीनने एअरबेस बांधल्याबद्दल सरकारच्या मौनावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“पंतप्रधान हे सैन्य नाही तर एक जबाबदार नेते आहेत”
काँग्रेसने सैन्याचा अपमान केल्याचा भाजपचा आरोपावर खेडा यांनी स्पष्ट केले की पंतप्रधानांना प्रश्न विचारणे हे सैन्याला प्रश्न विचारण्यासारखे नाही. ते म्हणाले, “पंतप्रधान हे देशाचे नेते आहेत, सैन्याचे नाही. त्यांना प्रश्न विचारणे हा आपला अधिकार आहे. जर आपण आपल्या पंतप्रधानांना प्रश्न विचारले नाहीत तर आपण पाकिस्तानला विचारू का?”
‘भाजपा विरोधकांना घाबरते’
पवन खेडा म्हणाले की, संपूर्ण विरोधी पक्ष संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करत आहे, परंतु सरकार भीतीपोटी ते बोलावत नाही. “ते विरोधकांना घाबरतात, पत्रकार परिषदांना घाबरतात, प्रश्नांना घाबरतात, कारण त्यांच्यात सत्याला तोंड देण्याची हिंमत नाही.”





