मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. मागच्या अडीच वर्षांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादीसारखे दोन मोठे पक्ष फुटले. त्यानंतर आता महाराष्ट्रात अजून एक राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे. शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस फुटणार असल्याची शक्यता आहे. त्याला करूनदेखील तसेच आहे.. एका भाजप नेत्याने केलेले वक्तव्य… काँग्रेसचा गेम होणार? यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अतिशय कमी जागा आल्या आहेत. राज्यातील 288 पैकी फक्त 16 जागा निवडून आलेले आहेत. राज्यात 55 ते 60 टक्के असणारा काँग्रेस पक्ष हा दहा टक्केवारीवर आलेला आहे. महाराष्ट्राच्या विकासाला गतीला अग्रेसर करण्याकरता काँग्रेसच्या आमदारांनी भाजपमध्ये विलीन व्हावं असे भाजपचे नवनिर्वाचित आमदार आशिष देशमुख म्हणाले आहेत. जनतेपासून काँग्रेसची नाळ तुटलेली आहे. बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण हे तर पडले. तर, नाना पटोले हे अतिशय कमी मताने जिंकलेले आहेत. काँग्रेससाठी ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. सध्या तरी काँग्रेसचे काही आमदार भाजपात विलीन होण्यासाठी सकारात्मक आहेत असेदेखील आशिष देशमुख म्हणाले. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये फूट पडणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.