Gambhir On Sanju : “संजूला मी आधीच सांगितलंय…!” मानहानीकारक पराभवानंतर सॅमसनच्या हकालपट्टीवर गंभीर यांच खळबळजनक वक्तव्य
Gambhir On Sanju : दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला संधी देण्यासाठी संजूला वगळण्यात आले होत. अखेर या वादावर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे.

Coach Gautam Gambhir Statement On Sanju Samson Dropped Team India : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. मंगळवारी ट्रेंट ब्रिजवर झालेला तिसरा सामना भारताच्या इतिहासातील सर्वात लाजिरवाणा पराभव ठरला, जिथे इंग्लंडच्या २०१ धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव अवघ्या ७६ धावांवर आटोपला आणि संघाने सामना १२५ धावांनी गमावला. या सामन्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी संजूबद्दल प्रथमच अधिकृत स्पष्टीकरण दिले.
प्रशिक्षक आणि खेळाडूतील ‘ती’ गुप्त चर्चा; गंभीरचा खुलासा –
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संजू सॅमसनच्या हकालपट्टीवर बोलताना गौतम गंभीर म्हणाले, “संजू सॅमसनला माझ्याकडून जे स्पष्टीकरण हवे होते, ते मी वैयक्तिकरित्या दिले आहे. ही पूर्णपणे एक प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्यातील गुप्त चर्चा आहे, जी मी सार्वजनिक करू शकत नाही. संजूबाबत आमच्या मनात पूर्ण स्पष्टता आहे, तो टी-२० वर्ल्ड कप विजयाचा मुख्य हिरो आहे. परंतु, कधीकधी संघ हितासाठी एखाद्या विशिष्ट खेळाडूचा चालू फॉर्म आणि पाहणे तितकेच गरजेचे असते.”
“What Sanju Samson has done for India at World Cup is phenomenal; no hard rule says he can’t return in this series.”
Gautam Gambhir delivers explosive press conference after Trent Bridge defeat #ENGvIND pic.twitter.com/r3FXgdS3Nb
— Siddharth Thakur (@fvosid) July 7, 2026
“संघात स्थान कमवावे लागते…!” गंभीर यांचा कडक इशारा –
Oh, so Gautam Gambhir wasn’t just informing Sanju Samson that he was being dropped from the playing XI. He was actually telling him that he wouldn’t be selected for the upcoming series either.💔 pic.twitter.com/SZZ1tdC23r
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) July 6, 2026
गंभीर यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले की, संजूचे या मालिकेत पुनरागमन होऊ शकत नाही, असा कोणताही नियम नाही. ते म्हणाले, “आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अंतिम निकाल महत्त्वाचा असतो. आम्हाला जे सर्वोत्तम कॉम्बिनेशन वाटते, आम्ही त्याचसह मैदानात उतरतो. माझा नेहमीच एक ठाम विश्वास राहिला आहे की, प्रत्येकाला भारतीय संघात खेळण्याचा हक्क स्वतःच्या कामगिरीने कमवावा लागतो.”
विश्रांती की थेट डच्चू? संजूच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह –
Sanju Samson looked completely disappointed during the 3rd T20I. Gautam Gambhir is destroying his career 💔 pic.twitter.com/V6vrEWDWTL
— Indian Cricket Ministry (@Tejashyyyyyy) July 8, 2026
टी-२० वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर भारतीय संघात मोठे बदल झाले. सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून हटवून श्रेयस अय्यरकडे धुरा सोपवण्यात आली. मात्र, भारताने आयर्लंडविरुद्धची मालिका २-० ने गमावली आणि आता इंग्लंडविरुद्धही संघ २-० ने पिछाडीवर आहे. इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या सामन्यात संजू सॅमसन फ्लॉप ठरल्यानंतर त्याला थेट बाहेर बसवण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे, आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या संघातूनही संजूला ‘विश्रांती’च्या नावाखाली वगळण्यात आले आहे. केवळ एकच फॉरमॅट खेळणाऱ्या खेळाडूला विश्रांती कशासाठी? की संजूला संघातून कायमचा डच्चू देण्यात आला आहे? असा गंभीर सवाल आता क्रीडा वर्तुळात उपस्थित केला जात आहे.





