इस्लामाबाद – पाकिस्तान आणि बांगलादेशने पुन्हा एकदा आपापसातील संबंध अधिक घट्ट करण्याचे ठरवले आहे. यासाठी द्विपक्षीय संबंधांसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार आणि बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री खलिलूर रहमान यांच्यात आज फोनवरून चर्चा झाली. त्यावेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करण्याबाबतची कटिबद्धता व्यक्त केली. द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सहकार्य वाढविण्यासाठी जवळचे संबंध सुरू ठेवण्यास त्यांनी सहमती दर्शविली. तसेच पश्चिम आशियातील स्थितीबद्दल दोन्ही देशांनी चिंता देखील व्यक्त केली आहे. पश्चिम आशिया आणि विस्तारीत प्रदेशामध्ये शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित होण्याबरोबरच विस्तृत परिणामांसाठी त्यांनी चिंता व्यक्त केली. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या पतनानंतर पाकिस्तान आणि बांगलादेशमधील संबंध सुधारले आहेत. दोन्ही देशांनी थेट उड्डाणे आणि व्यापार सुरू केला आहे तर त्यांचे सैन्य संरक्षण संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बांगलादेशमध्ये तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा बांगलादेशबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.