पाटणा – बिहारमधील ढासळती कायदे व्यवस्था आणि गुन्हेगारी घटनांत झालेली वाढ याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री यांनी चांगलीच जोरदार टीका केली. मात्र हे करताना त्यांची जीभही घसरली. राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांचे सरकार नपुंसकतेचे शिकार ठरले असल्याचे वादग्रस्त विधान मंत्री अश्विनी चौबे यांनी केले आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना चौबे म्हणाले की, दोन दिवसांपासून बिहारमध्ये हत्यांची मालिका सुरू आहे. मात्र बिहार सरकार आणि नितीश कुमार पूर्णपणे नपुंसकतेचे शिकार ठरले आहेत. सरकार असंवेदशील झाले असून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे.
बिहारमध्ये जंगलराज परत आले असून नितीश यांच्याकडून आता राज्याचा गाडा हाकला जाणार नाही. गुन्ह्याच्या घटना पाहता हे जंगलराज नाही तर काय आहे, असा सवाल त्यांनी केला.
Delhi MCD Election Result 2022 : दिल्लीच्या पराभवातही भाजपाला मोठा दिलासा
दरम्यान, चौबे यांनी सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली ते ठीक. मात्र त्यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल ज्या शब्दांचा उपयोग केला त्यावर टीका सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी बोलताना आपल्या भाषेकडे लक्ष दिले पाहिजे असा सल्ला त्यांना देण्यात आला आहे.