Chhagan Bhujbal । राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे पहिले स्वतंत्र अधिवेशन शिर्डीत आयोजित करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या अधिवेशनाला सर्वच नेते मंडळी उपस्थित राहतील असे म्हटले जात होते. त्यातच मागील काही दिवसांपासून नाराज असणारे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी देखील हजेरी लावली. यावेळी त्यांनी अधिवेशनाला येण्यामागचे खरे कारण सांगत अद्यापही आपण नाराजच सांगितले. एकत्रित राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार गटाचे स्वंतत्र, पहिलेच दोन दिवसीय अधिवेशन शिर्डीतआजपासून सुरू झाले. अधिवेशनात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्षबांधणी असे विषय चर्चेला असणार आहेत. दरम्यान, या कार्यक्रमात नाराज असलेले छगन भुजबळ आणि वादग्रस्त ठरलेले धनंजय मुंडे येणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यावरून छगन भुजबळांनी या अधिवेशनाला हजेरी लावली आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या विनंतीनुसार मी अधिवेशनाला आलोय असे म्हणत त्यांनी आपली भूमिका मांडली. दरम्यान, आज त्यांनी शिर्डीतील अधिवेशनात हजेरी लावली. याबाबत त्यांनी माध्यमांना प्रतिक्रियाही दिली. “नाराजी दूर होण्याचा प्रश्न येत नाही” Chhagan Bhujbal । छगन भुजबळ अधिवेशनात हजर राहिल्याने पत्रकारांनी त्यांना नाराजी दूर झाली का असा प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, नाराजी दूर होण्याचा प्रश्न येत नाही. प्रफुल्ल पटेल काल (१७ जानेवारी) दोन तास येऊन बसले होते. त्यांनी थोड्यावेळाकरता अधिवशेनात येण्याची विनंती केली. सुनील तटकरेंनीही फोन केला होता की येऊन जा. यानिमित्ताने साईबाबांचंही दर्शन होईल. दरम्यान, छगन भुजबळ यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नाही. याबाबत ते म्हणाले, “माझी प्रकृती बरी नसल्यानेच मी कोट वगैरे घालून आलोय. त्यामुळे मला येथे पूर्णवेळ थांबता येणार नाही.” असे देखील त्यांनी म्हटले. अजित पवारांनी माझ्याशी संपर्क साधला नाही Chhagan Bhujbal । “हे पक्षाचं शिबिर आहे. कोणाही व्यक्तीचं शिबिर नाही. मी येथे आलोय, म्हणजे सर्व गोष्टी स्वच्छ झाल्या असं होत नाही. राज्यसभेवर जाण्याचा प्रस्ताव माझ्याकडे नाही. मंत्रिपदाची वाटणी करताना तो प्रस्ताव माझ्याकडे होता, तेव्हाच मी तो नाकारला होता. अजित पवारांनी माझ्याशी संपर्क साधलेला नाही”, असे म्हणत त्यांनी आपली पुन्हा एकदा नाराजी बोलून दाखवली. हेही वाचा चार हजार लाडक्या बहिणींनी घेतला अर्ज मागे; परत केलेल्या पैशाचं काय होणार? आदिती तटकरेंनी स्पष्ट केली भूमिका