मुंबई – गृहमंत्री अमित शहा यांनी समाजात फूट पाडणारा कायदा आणला असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. तसेच अजित पवारांकडेच उपमुख्यमंत्रीपद द्यावे, अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
नवाब मलिक म्हणाले कि, अमित शहा यांनी समाजात फूट पाडणारा कायदा आणला आहे. शहा म्हणाले होते कि, बेकायदेशीर स्थलांतरितांना देशाबाहेर घालवून देण्यात येईल. पण यावर मोदींनी यूटर्न घेतला आहे. सीएए कलम १ (समानतेचा हक्क)विरुद्ध आहे आणि काहींनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी ते समाजात फूट पाडणारा कायदा आणला आहे.
तसेच सीएए आणि एनआरसी महाराष्ट्रात लागू केला जाणार नाही. व डिटेशन सेंटर उभे केले जाणार नाही. याबाबत उद्धव ठाकरे यांनी आश्वस्त केले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच करण्यात येईल. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री तारीख जाहीर करतील. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल, असेही त्यांनी सांगितले.