Saamana Agralekh : नुकतीच उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन हे विजयी झाले. त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला. आज राष्ट्रपती भवनात देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन हे शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या त्यांना पद आणि गोपनियतीची शपथ देणार आहेत. राष्ट्रपती भवनात हा शपथविधी समारंभ पार पडणार आहे. आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर शिवसेनेचे मुख्यपत्र असलेल्या दैनिक सामनातून गंभीर आरोप करण्यात आला आहे. उपराष्ट्रपतीपदी सी. पी. राधाकृष्णन यांची बहुमताने निवड झाली. हा किती प्रचंड, विराट विजय मिळवला याचे नगारे भाजप आणि त्यांचे लोक वाजवू लागले आहेत. एक तर ‘एनडीए’कडे आधीच चाळीसचे बहुमत होते व हाती अमर्याद सत्ता, पैसा असल्याने त्याचा वापर त्यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत केला, असा गंभीर आरोप सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. उपराष्ट्रपतीपदी झालेली निवड व्होट चोरीतून अग्रलेखातून निवडणूक आयोगावरही टीका करण्यात आली आहे. संवैधानिक पदासाठी म्हणजे उपराष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत या लोकांनी हा असा घोडेबाजार केल्याची कबुली दिली असेल तर भारताचा निवडणूक आयोग घोरत पडला आहे काय? निवडणूक आयोग उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांतही गांभीर्यान काम करीत नाही. व्होट चोरीचा खेळ येथेही होऊ दिला जातोय. हे असे खरेच घडले असे एकवेळ मान्य केले तर संघाचे उमेदवार असलेले सी. पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी झालेली निवड व्होट चोरीतून झाली आहे, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यासाठी काळा पैसा, ब्लॅकमेलिंग, धमक्यांचा वापर झाला, असंही म्हटलं आहे. भाजपवर टीकेचे बाण देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी राजीनामा दिल्यापासून ते गायब झाले. नव्या उपराष्ट्रपतींची निवड झाली तरी श्रीमान धनकड हे प्रकट झाले नाहीत. या गंभीर विषयावर ‘एनडीए’तील कोणीही तोंड उघडायला तयार नाही. निदान नवनियुक्त उपराष्ट्रपती महोदयांनी तरी या अदृश्य प्रकरणावर प्रकाश टाकावा, असा खोचक टोला लगावण्यात आला आहे. उपराष्ट्रपतीपद हे घटनात्मक प्रतिष्ठेचे पद आहे. त्यामुळे त्याची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे, पण सत्ताधारी भाजपकडून सी.पी. राधाकृष्णन यांच्या विजयाचे ढोल वाजवले जात आहेत. हे नेते उपस्थित राहणार आज नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा शपथविधी समारंभ राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे. या समारंभाला कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक गुलाबचंद कटारिया, झारखंडचे राज्यपाल संतोष गंगवार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे उपस्थित राहणार आहेत. हेही वाचा : सी.पी. राधाकृष्णन आज घेणार उपराष्ट्रपतीपदाची शपथ ; जगदीप धनखडही राहणार उपस्थित ?