डोक्यावर कर्जचं ओझं; दिवाळीत लेकरांना कपडे घ्यालाही पैसा नाही; हवालदिल झालेल्या शेतकरी बापाने केला आयुष्याचा शेवट

Chhatrapati Sambhajinagar News | अलिकडेच मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याच्या घरात ऐन दिवाळीत अंधारमय परिस्थिती ओढवली आहे. यातच आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण तालुक्यात तुपेवाडी तांडा येथे एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे.
दिवाळी सण साजरा करण्यासाठी, लेकरांना नवीन कपडे घेण्यासाठी पैसे नसल्याच्या कारणाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं आहे. नामदेव लालसिंग राठोड असं आत्महत्या करणाऱ्या ४५ वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. त्यांच्या डोक्यावर ८ लाखांचं कर्ज होतं. Chhatrapati Sambhajinagar News |
अतिवृष्टीने पिकांचं झालेलं नुकसान, सततची नापिकी, बँकांचे घेतलेले पीककर्ज आणि लोकांची उसणवारी, त्यात शासनाची अतिवृष्टीची मदतही नाही. त्यामुळे दिवाळीत लेकराबाळांसह घरच्यांना कपडे आणि इतर साहित्य कसं खरेदी करणार? ह्याची चिंता राठोड यांना होती.
अखेर नैराश्यात त्यांनी आपल्या घरासमोर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ऐन दिवाळीत राठोड यांनी आयुष्याचा शेवट केल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. Chhatrapati Sambhajinagar News |
हेही वाचा :





