Breaking news : ‘या’ महिलांना मिळणार दरमहा ३,००० रुपये; सरकारचा मोठा निर्णय !
योजनेची प्रक्रिया उद्यापासून सुरू होतेय, महिलांनी अर्ज भरताच त्यांच्या बँक खात्यात ३,००० रुपये हस्तांतरित होण्यास सुरुवात होईल.

Breaking news – पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी मंगळवारी राज्यातील जनतेसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्य सरकार 27 मे पासून (बुधवारपासून) अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज वितरित करण्यास सुरुवात करणार असून, या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 3,000 रुपये आर्थिक मदत दिली जाईल.
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सर्व भारतीय नागरिक पात्र आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. नादिया जिल्ह्यातील कल्याणी येथे झालेल्या प्रशासकीय बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
सामाजिक हिताचा मोठा निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की, शाळा, महाविद्यालये आणि कोणत्याही प्रार्थनास्थळांच्या एक किलोमीटरच्या परिघात मद्यविक्रीच्या दुकानांना परवानगी दिली जाणार नाही.
याशिवाय, राज्यातील सुमारे 400 विशेष उपहारगृहांमध्ये (कँटीनमध्ये) सर्वसामान्यांसाठी आठवड्यातून दोनदा अवघ्या 5 रुपयांच्या सवलतीच्या दरात मासे आणि भात हे जेवण उपलब्ध करून दिले जाईल. तसेच, आरोग्य विभागापासून स्वतंत्र करून राज्यात आयुष विभागाची स्थापना केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
महिलांच्या बँक खात्यात येणार 3, 000 रुपये
नादिया जिल्ह्यातील कल्याणी येथे प्रशासकीय बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, अन्नपूर्णा योजनेचे अर्ज राज्य सचिवालयाकडून उद्यापासून दिले जातील.
सर्व भारतीय नागरिक या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यास पात्र आहेत.मुख्यमंत्री म्हणाले, “आमच्या अन्नपूर्णा योजनेची प्रक्रिया उद्यापासून सुरू होतेय, महिलांनी अर्ज भरताच त्यांच्या बँक खात्यात ३,००० रुपये हस्तांतरित होण्यास सुरुवात होईल.”
मुख्यमंत्री शुभेंदु हे येण्याआधीच सॉल्ट लेकमधील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यालयाबाहेर शेकडो लोक जमले होते, ज्यामुळे इमारतीच्या आजूबाजूच्या अरुंद रस्त्यांचे प्रतीक्षागृहात रूपांतर झाले होते.
नोकरी शोधणाऱ्यां तरुणांच्या हातात फायली होत्या, तर ज्येष्ठ नागरिकांनी कागदपत्रांचे गठ्ठे उचलले होते. शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, परिचारिका, पोलिसात नोकरी करू इच्छिणाऱ्या महिला आणि इतरही उपस्थित होते.






