मुंबई – महागाई, बेरोजगारी, जीएसटी, अग्निपथ योजना, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर काँग्रेसने देशव्यापी आंदोलन केले. महाराष्ट्रातही काँग्रेसचं आंदोलन झालं. आंदोलनावेळी काँग्रेसच्या अनेक आमदार आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आंदोलनानंतर नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिक स्पष्ट केली. तसेच सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र सोडलं. भाजप सरकारने आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, असा आरोप नाना पटोले यांनी केला. गांधी परिवाराला टार्गेट करण्याचा प्रयत्न सातत्याने होतं आहे, असेही पटोले म्हणाले.
नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्रात मोठया प्रमाणात पाऊस झाला. परंतु अजूनही पंचनामे झाले नाहीत. आम्ही या सगळया बाबींच्या विरोधात शुक्रवारी आंदोलनं केलं. आम्ही आमची मीटिंग विधान भवनात करत होतो, त्याचवेळी आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. एकट्या मुंबईत 10 हजारापेक्षा जास्त लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
मुंबई पोलिसांचे केदार दिघे यांना समन्स; बलात्कार पीडितेला धमकावल्याप्रकरणी होणार चौकशी
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना फरफडत पोलीस घेऊन गेले. आम्हीं शांततेत आंदोलन करतं होतो, परंतु तरीदेखील आम्हाला ताब्यात घेण्यात आलं. गांधी परिवाराला टार्गेट करण्याचा प्रयत्न सातत्याने होतं आहे. लोकशाही वाचवणं हा आमचा धर्म आहे. आम्ही ते करतं राहणार आहे, असे नाना पटोले म्हणाले. निर्मला सीतारामन म्हणतात देशात सगळं ठीक आहे. परिस्थिती वेगळी आहे. जनतेची लढाई आम्ही लढत राहणार आहोत. जनतेची हक्काची लढाई आम्ही लढत रहाणार अहोत, असेही पटोले म्हणाले.
राष्ट्रीय जनता दलाच्या अध्यक्षपदाची धुरा तेजस्वी यादव यांच्याकडे जाणार?