BJP vs Shiv Sena : बुलढाणा जिल्ह्यातील महायुतीतील अंतर्गत वाद (BJP vs Shiv Sena) पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना (शिंदे गट)चे बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमुळे जिल्ह्यातील राजकारण तापले असून, वंचित बहुजन आघाडीनेही या प्रकरणात उडी घेतली आहे. संजय गायकवाड यांचा नेमका आरोप काय? आमदार संजय गायकवाड यांनी भाजप जिल्हाध्यक्ष (BJP vs Shiv Sena) विजयराज शिंदे यांना ‘दुसरा भोंदूबाबा अशोक खरात’ म्हटले आहे. त्यांच्या मते, विजयराज शिंदे यांच्या निवासी शाळा (आश्रमशाळा) मध्ये शिकणाऱ्या अनेक विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केले गेले आहेत. शिंदे यांनी अनेक मुलींचे आयुष्य बरबाद केले असून, त्यांच्या इज्जती लुटल्या आहेत, असा धक्कादायक आरोप गायकवाड यांनी केला आहे. याशिवाय, शिंदे यांच्या शाळेतील काही महिला कर्मचारी या प्रकारात मध्यस्थी करत असल्याचाही गायकवाड यांचा दावा आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. Eknath Shinde Meet CM Devendra Fadanvis वंचित बहुजन आघाडीची तीव्र प्रतिक्रिया या आरोपांनंतर वंचित बहुजन आघाडीनेही प्रतिक्रिया दिली आहे. वंचितचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांनी संजय गायकवाड यांना आजी-माजी विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांची माफी मागण्याची मागणी केली आहे. माफी न मागितल्यास पोक्सो (POCSO) कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. वंचितकडून म्हटले आहे की, या आरोपांमुळे शिंदे यांच्या शाळेत शिकलेल्या अनेक माजी विद्यार्थिनी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक तणाव सहन करावा लागत आहे. माफी न मागितल्यास वंचित जिल्हाभर रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही देण्यात आला आहे. विजयराज शिंदे यांची प्रतिक्रिया भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी गायकवाड यांच्या आरोपांना जोरदार खंडन केले आहे. त्यांनी या वक्तव्याला ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असे म्हटले आहे. शिंदे यांनी यापूर्वी नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चौकशी व्हावी, असे विधान केले होते, ज्यावरून हा पलटवार झाला असल्याचे दिसते. हे प्रकरण नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (BJP vs Shiv Sena) यांच्या फसवणूक आणि लैंगिक शोषणाच्या आरोपांशी जोडले गेले आहे. खरात प्रकरणात एकनाथ शिंदे यांच्यासह इतर नेत्यांच्या संपर्काची चर्चा सुरू असतानाच बुलढाण्यात हा नवा वाद उफाळून आला आहे. महायुतीतील दोन्ही पक्षांमधील पूर्वीचे छोटे-मोठे वाद आता या गंभीर आरोप-प्रत्यारोपात रूपांतरित झाले आहेत. सध्या बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय वातावरण तणावपूर्ण आहे.